गोपाळबाबा वलंगकर साहित्यनगरी (रत्नागिरी) : प्रगतीशील लेखक संघ (महाराष्ट्र) आणि रत्नागिरीतील एस. पी. हेगशेट्ये महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या पहिल्या प्रगतीशील साहित्य संमेलनाच्या तिसऱ्या दिवशी (ता. ३) दुपारच्या सत्रात ‘कॉम्रेड शरद पाटील समजून घेताना’ हा परिसंवाद झाला.
यात महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठाचे सहाय्यक प्राध्यापक आणि समाजशास्त्रचे प्रा. राहुल कोसंबी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील इतिहास विषयाचे प्रा. उमेश बगाडे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील अर्थशास्त्राच्या प्राध्यापिका वंदना सोनाळकर, सांगलीतील कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयाचे इतिहासाचे पदवी व पदव्युत्तर स्तरावर विभागप्रमुख सचिन गरुड सहभागी झाले होते. परिसंवादाचे अध्यक्षपद प्रा. उमेश बगाडे यांनी भूषविले.
“जाती म्हणजे काय या प्रश्नाचे उत्तर आपल्याला शरद पाटील देत नाहीत, भारतामध्ये जाती आहेत की वर्ण आहेत हा पण एक कळीचा मुद्दा आहे. कुठल्याही समाजशास्त्रज्ञाला भारतातल्या जातीव्यवस्थेला एक व्यवस्था म्हणून हात घातल्याशिवाय स्वतःचे वेगळे म्हणणे मांडता आले नाही, ” असे प्रा. राहुल कोसंबी यांनी सांगितले.
वंदना सोनाळकर म्हणाल्या, “मार्क्ससिस्ट विचारांच्या चौकटीमध्ये एक आपला वेगळा विचार मांडण्याचा प्रयत्न करतात. तसेच आर. बी. मोरे यांनी कम्युनिस्ट पक्षामध्ये सदस्यत्व घेतल्यानंतर बाबासाहेबांचे विचार आणि दलितांचे प्रश्न मांडण्याचा प्रयत्न केला. जातीचा प्रश्न कसा महत्त्वाचा आहे, दलितांची चळवळ ही क्रांतिकारी चळवळीशी कशी जोडली गेलेली आहे हे दाखवले आहे. अभ्यासक्रमामध्ये पाटलांना फारसे स्थान दिलेले नाही. आणि त्यामुळे शैक्षणिक चर्चा त्यांनी फारशी झालेली नाही. आणि म्हणून एक अर्थाने त्यांची युक्तिवादाची पद्धत ही सुद्धा मार्क्स वादामध्ये ज्या पद्धतीने होते त्या पद्धतीची आहे. ” “मला शरद पाटील यांच्याकडून भारतीय समाजाबद्दल, भारतीय समाजाच्या इतिहासाबद्दल बरेच काही मिळाले. पण आज आपण अशा ठिकाणी आलेलो आहोत समाजामध्ये मार्क्सवाद कमी झालेला आहे. कम्युनिस्ट हे हिटलर सारखेच होते आणि कम्युनिस्ट शिवी घातल्यासारखीच आहे.”
परिसंवादाचे अध्यक्ष डॉ. बगाडे म्हणाले की, “शरद पाटील हे मार्क्ससिस्ट क्लिनीनिस्ट राहिले आहेत. किंबहुना चिकित्सा करायचीच असेल आणि जर तुम्हाला मर्यादाच सांगायची असेल कॉम्रेड शरद पाटलांची तर त्याला मार्क्ससिस्ट क्लिनीनिझमचीच सांगायला लागेल. इतपत ते मार्क्ससिस्ट क्लिनीनिस्ट होते. त्याच उदाहरण देताना ते म्हणाले आणि मानवशास्त्राच्या अध्ययनाचा जो प्रकल्प उभारला तोच मूलत: मार्क्सवादाच्या रशियामध्ये कोसळण्याशी संबंधित आहे. शरद पाटलांनी सहा-सात वर्ष घालून ज्याला संस्कुत व्याकरणाची जी अब्राह्मणी परंपरा आहे ती परंपरा समजून घेतली. मार्क्सवाद जर विग्रहाचे तत्त्वज्ञान मांडतो तर मग ज्या समाजामध्ये विग्रह आहे आणि तो विग्रह शोधण्याचा प्रयत्न म्हणून तुम्ही त्यांच्या स्त्री सत्तेचे अध्ययन केले पाहिजे.”
ते पुढे म्हणाले, “प्राथमिक साम्यवादाच्या काल्पिताने समजले की एकदा का उत्पादनाची साधने राज्याच्या ताब्यात आली की क्रांती झाली. वर्गविरहीत समाज झाला. रशियाच्या, चीनच्या अपयाच्या पार्श्वभूमीवर मार्क्सवादाची मर्यादा सांगत आहेत की तुमच्या विचार करण्यामध्ये जी यांत्रिकता आली आहे, की असे घडल्यावर असे होणार ते चूक आहे, कारण प्राचीन कालखंडमधला विग्रह स्त्री विरुद्ध पुरुष होता. अगदी स्त्री सत्ता असतानासुद्धा वर्चस्व स्त्रियांचे होते आणि पुरुष अधीन होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पाचव्या खंडात ते म्हणतात की भारतातले सर्वहारा कोण आहेत, ते दलित आहेत, भटके विमुक्त आहेत, आदिवासी, ओबीसी हे सामाजिक सर्वहारा आहेत, दुसरे कोण तर आर्थिक सर्वहारा आहेत आणि यांच्या बरोबरीने वर्गीय चौकटीमध्ये सर्वहारा म्हणजे शेतकरी, कातकरी आहेत. त्याचं म्हणणे आहे की भारतामध्ये क्रांती करणारा घटक कोणता आहे तर तो दलित आहे असे त्यांनी त्या काळामध्ये उभा केलेला मुद्दा आहे आणि जो अक्षरशः मार्क्सवादाचा जो आकृतीबंध आहे तो फुले, आंबेडकर वादाच्या चौकटीत सामावून सांगण्याचा प्रयत्न आहे.”
“तुम्ही जेव्हा जातीच्या विरोधाला भिडता तेव्हा जातीचा मुलभूत आधार स्त्री शोषण, स्त्री दास्य आहे हे समजून घ्याव लागते. आणि हे समजून घेताना भारतीय समाज वास्तवाला समजून घेण्याच जे वेगळे दर्शन तयार होते, ते कॉम्रेड शरद पाटलांनी उभे केले आहे. जातीचा लिंग भावाशी, लिंग भावाचा वर्गाशी ही परिभाषा कॉम्रेड शरद पाटलांनी अभासमध्ये रूढ केली आहे. म्हणजे acadamyवाले शरद पाटलांचे नाव घेत असोत किंवा नसोत भारतामध्ये ख्यातनाम अभ्यासक हे जात, वर्ग, लिंगभावाचा विग्रह आणि त्याची परिभाषा जी वापरतात त्याची पुष्टभूमी ही शरद पाटलांनी उभी केलेल्या विश्लेषणाच्या तंत्राची आहे. आणि हे विश्लेषण तंत्र कॉम्रेड पाटलांनी आपल्याला दिलेले आहे ते आपण नीट समजून घेणे गरजेचे आहे,“ असे श्री. बगाडे यांनी सांगितले.