
रत्नागिरी : वीज पडून एकाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वरमध्ये घडली आहे. संगमेश्वर तालुक्यातील कळबंस्ते हाक्रवणेमधे आज सांयकाळी सहा वाजता ही घटना घडली.
मलदे वाडीतुन मजुरी करुन घरी जात असताना धरणाजवळ विज पडली व त्यामधे नारायण तावडे (४५) या ईसमाचा जागीच मृत्यु झाला. त्याला संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले