
रत्नागिरी, 3 june : निसर्ग चक्रीवादळाचा तडाखा कोकण किनारपट्टीला देखील बसला. ठिकठिकाणी नुकसानीच्या घटना देखील घडल्या. मात्र या वादळी वाऱ्याचा फटका पक्षांनाही बसला. अनेक पक्षी मुसळधार पावसाने गारठले होते, तर काही पक्षी वाऱ्यामुळे कोलमडून पडले. आकाशात अधिराज्य गाजवणारी घारही यातून सुटली नाही. रत्नागिरीजवळच्या भाट्ये गावातही अनेक घारी पडल्या होत्या. याच गावातील स्थानिकांनी त्यांना उचलून एका सुरक्षित ठिकाणी ठेवलं. त्यानंतर थोडी ऊब मिळाल्यानंतर या घारी उडून गेल्या. मात्र त्यांची अवस्था अतिशय बिकट होती. स्थानिक विकी मोरे, रोहित मुरकर, अभिषेक मुरकर, बिपीन पटेल, स्वप्नील चव्हाण या स्थानिकांनी या घारीनी सुरक्षित ठिकाणी नेऊन जीवनदान दिलं