मुंबई : पंतप्रधान नरेद्र मोदी यांच्या घोषणे नुसार जर सर्व देशात व महाराष्ट्र एकाच वेळी लाईट बंद केले तर वीजेची डिमांड एकदम कमी होऊन जाईल.आधीच डिमांड कमी झाल्यामुळे वीज निर्मिती व सप्लाय चे गणित बिघडले आहे. जर सर्वांनी एकाच वेळी लाईट बंद केले तर अजून परिस्थिती बिघडून जाईल व तसेच स्टेट तसेच सेंट्रल ग्रीड हाय फ्रिक्वेन्सी वर फेल होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.म्हणून अश्या विधानाचा परत एकदा पतंप्रधान यांनी फेरविचार विचार करावा व लाईट बंद न करता फक्त दिवे किंवा मेणबत्ती लावावी जे जिवाची पर्वा न करता अविरत सेवा देतात त्याना सलाम करण्यासाठी, अशी मागणी महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन सघंटनेने केंद्र व राज्य सरकारकडे केलेली आहे.
सध्या स्थितीत महाराष्ट्राची पॉवर डिमांड ३२००० मे.वॕट (MW) वरून १६००० मे.वॕट (MW) पर्यत म्हणजेच ५०% कमी झालेली आहे.राज्यातील अनेक कंपन्या बंद आहेत त्यामुळे इंडस्ट्रियल लोड कमी झालेला आहे. महानिर्मीती कंपनी ३०४० मे.मॕगावट ऐवढीच वीज निर्मिती करत आहे.केंद्र सकारचा वाटा पाॕवर ग्रिड व इतर खाजगी वीज निर्मिती कंपन्या इतर निर्मिती करत आहे. मागणी कमी झाल्यामुळे महानिर्मीती कंपनीस अनेक संच बंद व स्लो डाऊन करावे लागले आहेत. विजेचा वापर फक्त अत्यावश्यक सेवा,घरघुती व कृर्षी वापरासाठी होत आहे.जर सर्वांनी अचानक दिवे बंद केले तर ग्रीड फेल होऊन सर्व पॉवर स्टेशन high frequency वर ट्रिप होतील.त्यामुळे महाराष्ट्र राज्य व संपुर्ण देश अंधारात जाईल.महाराष्ट्रा सारखे मोठे पॉवर डिमांड असलेले राज्य जर ग्रीड failure मुळे सर्व निर्मिती संच बंद पडले तर मल्टिस्टेट ग्रीड failure होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे हॉस्पिटल सह सर्व सेवा विस्कळीत होण्याची शक्यता नाकारता येत नाही.याचा विचार केंद्र सरकारने करावा.
परिस्थिती नॉर्मल व्हायला जाईल १ आठवडा
वीज निर्मिती संच जर बंद झाले तर एक निर्मिती संच सर्विस मध्ये यायला साधारण १२ ते १६ तास लागतात या प्रमाणे सर्व परिस्थिती नॉर्मल व्हायला साधारण १ आठवडा जाईल.म्हणून पतंप्रधान यांच्या घोषनेचा विचार करावा.राज्य सरकार कडे सघंटनेची मागणी आहे कि जो पर्यत वीजेची मागणी कमी आहे तोपर्यंत खाजगी वीज निर्मिती संच याना देण्यात येणारे फिक्स चार्जेस देणे बंद करावे, असे फेडरेशनने म्हटले आहे.
अवैज्ञानिक आवाहन फेटाळा : भाकपचे आवाहन
सर ठिकाणी दिवे बंद केले तर मल्टी स्टेट ग्रीड फैलुअर होण्याची शक्यता आहे म्हणून पंतप्रधानांनी आपल्या आवाहनाचा फेरविचार करावा असे पत्रक ‘महाराष्ट्र स्टेट ईलेक्ट्रीसिटी वर्कर्स फेडरेशन’ चे सरचिटणीस कॉ.कृष्णा भोईर व अध्यक्ष कॉ.मोहन शर्मा ह्यांनी काढले आहे.
त्याचा आधार घेऊन भारतीय कम्युनिस्ट पक्षाने, पंतप्रधानांचे अवैज्ञानिक आवाहन फेटाळावे, आगीशी खेळ खेळू नये, अशी विनंती जनतेला केली आहे.