रत्नागिरी, 22 July : निसर्ग चक्रीवादळात भरकटुन मिर्या किनार्याला लागलेले बसरा स्टार एजन्सीचे इंधनवाहू जहाज किनार्यावर पुरते बसले आहे. उधाणाच्या तडाख्यात जहाजाचे नुकसान झाले आहे. जहाज काढण्याबाबत एजन्सीकडून अपेक्षित हालचाली होत नसल्याने त्याना चार दिवसाचा अल्टीमेटम देण्यात आला आहे. त्यांनी जहाज भंगारात काढणे किंवा दुरूस्त करण्याचा निर्णय घ्यायचा आहे, अशी माहिती प्रादेशिक बंदर विभागाकडून देण्यात आली आहे.
निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्यात हे जहाज भरकटुन मिर्या किणार्यावर लागले आहे. दीड महिना झाले तरी जहाज काढण्याबाबत एजन्सीकडून अपेक्षित गती दिसत नाही. त्यात भरतीमुळे उठणार्या अजस्र लाटांचा मारा जहाज सोसत आहे. त्यामध्ये जहाज दयनिय अवस्था झाली आहे. जहाजामध्ये पाणी भरून केबिन असलेल्या भागा किनार्यावर रुतला आहे. त्यामुळे जहाज हेलकावे खावून बंधार्याला आदळण्याचे प्रमाण कमी झाले आहे.
दरम्यान या जहाजामध्ये असलेल जळके ऑईल आणि 25 हजार लिटर डिझेल गळतीचा किनार्याला धोका होता.मात्र भारत सरकारच्या डीजी शिपिंग कंपनीचे तांत्रिक अधिकारी, जहाजाचे कॅप्टन, कर्मचारी आदींनी चार से सहा दिवसाची मोहिम आखुण जहाज इंधनमुक्त केले आहे.
प्रादेशिक बंदर विभागाने जहाजाच्या एजन्सीला यापूर्वीही नोटीस बजावली होती. त्यानुसार किनारा सुरक्षेबाबत तत्काळ पावले उचलण्यात आली. जहाज इंधनमुक्त झाल्यानंतर आता दुसरी नोटिस बंदर विभागाने एजन्सीला दिली आहे. त्यासाठी चार दिवसाचा अल्टिमेटम दिला आहे. चार दिवसात जहाज भंगारात काढा किंवा किनार्यावर दुरूस्त करून ओढून नेण्याबाबत निर्णय घ्यावा, अशी नोटिस बजावल्याचे बंदर विभागाकडून सांगण्यात आलं आहे.
दरम्यान या जहाजामध्ये असलेल जळके ऑईल आणि 25 हजार लिटर डिझेल गळतीचा किनार्याला धोका होता.मात्र भारत सरकारच्या डीजी शिपिंग कंपनीचे तांत्रिक अधिकारी, जहाजाचे कॅप्टन, कर्मचारी आदींनी चार से सहा दिवसाची मोहिम आखुण जहाज इंधनमुक्त केले आहे.
प्रादेशिक बंदर विभागाने जहाजाच्या एजन्सीला यापूर्वीही नोटीस बजावली होती. त्यानुसार किनारा सुरक्षेबाबत तत्काळ पावले उचलण्यात आली. जहाज इंधनमुक्त झाल्यानंतर आता दुसरी नोटिस बंदर विभागाने एजन्सीला दिली आहे. त्यासाठी चार दिवसाचा अल्टिमेटम दिला आहे. चार दिवसात जहाज भंगारात काढा किंवा किनार्यावर दुरूस्त करून ओढून नेण्याबाबत निर्णय घ्यावा, अशी नोटिस बजावल्याचे बंदर विभागाकडून सांगण्यात आलं आहे.