मुंबई, (विशेष प्रतिनिधी) : टोमॅटोचे दर प्रचंड वाढल्याचा परिणाम म्हणून की काय ते चक्क चोरीला जाण्याचे प्रकार घडला आहे. सकाळी २० ते ३० आणि रात्रीच्या सुमारास १५ ते २० रुपये किलो मिळणाऱ्या टोमॅटोचे भाव १०० रूपयांवर पोहोचले आहेत. हीच संधी साधून चोरट्यांनी तब्बल ३०० किलो टोमॅटो चोरीला गेले आहेत. दहिसर पूर्व स्टेशन परिसरात टोमॅटोची विक्री घाऊक व्यावसायीक शामलाल रॉय यांच्याकडूल टोमॅटो चोरी झाले. रविवारी पहाटे ही घटना घडली आहे.
कांद्याचे भाव जेव्हा वाढले होते. तेव्हा कांदाही चोरी होत होता. आता टोमॅटोबाबतही तसाच प्रकार घडत आहे. शामलाल यांनी दहिसर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
व्यापाऱ्याने टोमॅटो रस्त्याच्या जवळ ठेवले होते. याप्रकरणाचा तपास सुरु आहे, असे दहिसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाष सावंत यांनी सांगितले.