
रत्नागिरी : तिवरे धरण दुर्घटनेत बेपत्ता असलेल्या आणखी एका महिलेचा मृतदेह सापडला आहे. त्यामुळे मृतांची संख्या 21 वर पोहचली आहे. सुशीला विश्वास धाडवे असं या महिलेचं नाव आहे.
तिवरे धरण दुर्घटनेत सुरुवातीला 23 जण बेपत्ता होते असं सांगितलं जात होतं. मात्र 23 व्या अनोळखी व्यक्तीबद्दल कुठेही मिसिंगची तक्रार नाही. त्यामुळे या दुर्घटनेत 22 जणच बेपत्ता होते. पैकी 20 जणांचे मृतदेह यापूर्वी सापडले होते. दीड वर्षांची दूर्वा आणि एक महिला बेपत्ता होती. पैकी सुशीला विश्वास धाडवे यांचा मृतदेह रविवारी रात्री कादवड येथे सापडला. त्यामुळे एकूण 21 जणांचे मृतदेह अद्यापपर्यंत सापडले आहेत. मात्र दीड वर्षांची दूर्वा चव्हाण अद्यापही बेपत्ता आहे.















