रत्नागिरी, (आरकेजी) : रत्नागिरी जिह्यात स्वाईन फ्लूचे सहा रूग्ण आढळले आहेत. त्यांना अधिक उपचारासाठी कोल्हापूर येथे दाखल करण्यात आले आहे. जानेवारीपासून आत्तापर्यंत तपासणीमध्ये जिल्हय़ात स्वाईन फ्लूचे १२ संशयित रूग्ण आढळले आहेत. त्यातील सहा रूग्णांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्याची माहिती प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर पी एन देवकर यांनी दिली आहे. यातील बहुतांश रुग्ण हे पुणे, मुंबई येथे गेले होते आणि त्यांना तिकडे लागण झाली असल्याचा अंदाजही त्यांनी व्यक्त केला आहे.
राज्याच्या काही भागात सध्या स्वाईन फ्लूचा फैलाव वाढला आहे. काही ठिकाणी रुग्ण दगावल्याच्याही घटना घडल्या आहेत. गेल्यावर्षी सुद्धा गणेशोत्सवादरम्यान स्वाईन फ्लू ने डोके वर काढले होते. या पार्श्वभुमीवर रत्नागिरी जिह्यातही आरोग्ययंत्रणेकडून खबरदारी घेतली जात आहे.