Mumbai : मुंबई पोर्ट ट्रस्टमध्ये 16 ते 30 सप्टेंबर 2021 दरम्यान स्वच्छता पंधरवडा साजरा करण्यात येत आहे. सर्व विभागांमध्ये स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली आहे. इंट्रानेटवर डिजिटल फलक तसेच विविध ठिकाणी स्वच्छतेचा संदेश देणारे फलक लावण्यात आले आहेत.
मुंबई पोर्ट ट्रस्टचे अध्यक्ष राजीव जलोटा यांनी विभाग प्रमुखांना आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना स्वच्छतेची शपथ देऊन स्वच्छता कार्यक्रमाला सुरुवात केली. संबंधित विभागांमधेही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना स्वच्छतेची शपथ देण्यात आली.