दोघांविरोधात शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल; या सिस्टिमचा आधार घेवून परदेशात दहशतवादी कारवायांसाठी याचा वापर होत आहे का? याचा शोध घेताहेत पोलीस
रत्नागिरी, प्रतिनिधी : हायस्पिड इंटरनेटद्वारे सिप ट्रंक सिस्टिमार्फत देशासह परदेशात संपर्कासाठी कॉलिंग सेंटर चालविणारया टोळीचा मास्टर माईंड फैजल रज्जाक अली रज्जाक सिद्दीकी याच्यासह मोबाईल शॉपी मालकाला दहशदवात विरोधी पथकासह शहर पोलीसांनी अटक केली आहे. कमी पैशात कॉलिंग करुन देशाचे आर्थिक नुकसान करण्यात येते होते. तर या सिस्टिमचा आधार घेवून परदेशात दहशतवादी कारवायांसाठी याचा वापर होत आहे का? याचा शोध पोलीसांनी सुरु केला आहे. अशा प्रकारची सिस्टिम रत्नागिरी शहरातील आठवडा बाजार येथे मिळाल्याने शहरात खळबळ उडाली आहे.
रत्नागिरी शहरातून हायस्पिड इंटरनेटद्वारे इंटरनॅशनल कॉल होत असल्याचे मुंबई एटीएसला तंत्रज्ञानाच्याद्वारे समजलं होतंं. त्यांनी माहिती रत्नागिरी दहशदवाद विरोधी पथकाला कळविली. यानंतर आठवडा बाजार येथील मोबाईल दुकानात पोलिसांनी धाड टाकली. इंटरनॅशनल कॉलिंग सेंटर चालविण्यासाठी आठवडा बाजार येथील श्रीटेक दुकानाचे मालक अलंकार अरविंद विचारे यांच्या दुकानात कॉलिंगचा सर्व्हर बसवण्यात आला होता. या सर्व्हरवरूनच इंटरनॅशनल कॉलिंग सुरू होतंं.
मोबाईल शॉपी मालकाच्या नावे एका खाजगी कंपनीचे हायस्पिड इंटरनेट कनेक्शन घेण्यात आले होते. त्यामार्फत येथील सर्व्हरवरुन कॉलिंग सेंटर वांद्रेमधील एका इमारतीतून सुरू होते. वाईप अँपद्वारे हे इंटरनॅशनल कॉलिंग सुरू होते. रत्नागिरीतून इंटरनॅशनल कॉलिंगसाठी बसवण्यात आलेल्या सर्व्हरसह दुकानमालक अलंकार अरविंद विचारे (रा. छत्रपतीनगर, रत्नागिरी) याला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी याची माहिती पोलीसांना दिली.
या प्रकरणातील मास्टर माइर्ड ओळखला जाणारा फैजल रज्जाक अली रज्जाक सिद्दीकी (रा. पनवेल, नवी मुंबई) हा रत्नागिरीत येत असल्याची माहिती रत्नागिरी एटीसीला मिळाली होती. या माहितीवरुन शुक्रवारी साळवी स्टाँप येथे सापळा रचण्यात आला होता. पोलिसांनी फैसल याला मोठ्या शिताफीने साळवी स्टॉप येथे ताब्यात घेतले. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या अलंकार विचारे व फैसल सिद्दीकी या दोघांविरोधात शहर पोलीस स्थानकात भा.दं.वि.कलम ४२०, ३४, आयटी अँक्ट ४३(ह), ६६(ड), इंडियन टेलिग्राफीक अँक्ट ४, २०, २५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक अनिल लाड करीत आहेत.
इंटरनॅशनल कॉलचा वापर केेेवळ परदेशात बोलण्यासाठी झाला, की दहशतवादी कारवायांसाठी याचा वापर होत होता. याचा शोध शहर पोलीसांनी सुरु केला आहे. केवळ कॉलिंग करायचे असेल तर सर्व्हर रत्नागिरी व सेंटर मुंबईत करण्यामागील कारण काय ? असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.