औरंगाबाद : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यातील दोन लाख शेतकऱ्यांना लाभ देण्यात आला आहे,अजुनही कर्ज योजनेची प्रक्रिया सुरू आहे. परंतु कर्जमाफी हा अंतिम उपाय नाही. जलसंधारणाच्या माध्यमातून शाश्वत सिंचन, वीज आणि बाजारपेठेचीउपलब्धता यातून शेतकऱ्यांना स्वयंपूर्ण करणार असल्याचे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लासूर येथे व्यक्त केले.
लासूर येथे बजाज पाणी संवर्धन प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्यातील 262 कोटी रुपयांतून 1 लाख 50 हजार एकर क्षेत्रावर जलसंधारणाच्या कामांच्याउद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, जिल्हा परिषद अध्यक्षा ॲङ देवयानी डोणगावकर, खासदार चंद्रकांत खैरे, आमदारसर्वश्री अतुल सावे, प्रशांत बंब, बजाज उद्योग समूहाचे उपाध्यक्ष मधुर बजाज, जानकीदेवी बजाज ग्रामविकास संस्थेचे अध्यक्ष चंद्रप्रकाश त्रिपाठी, विभागीय आयुक्तडॉ. पुरूषोत्तम भापकर, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकर अर्दड आदी उपस्थित होते.जलयुक्त शिवार अभियान या योजनेला लोकसहभागातून चळवळीचे स्वरुप प्राप्त झाले आहे. मागील तीन वर्षात 11 हजार गावेदुष्काळमुक्त झाली असून यावर्षी पाच हजार गावे दुष्काळमुक्त करण्याचा संकल्प आहे. या योजनेच्या माध्यमातून पीक पध्दतीत बदल झाला आहे.लोकसहभागातून सुमारे 500 कोटीरुपयांचा निधी उभा राहिला आहे. पूर्वी पब्लिक – प्रायव्हेट-पार्टनरशिप (PPP) असे मॉडेल होते. परंतू आता शासनाने ‘पब्लिक-प्रायव्हेट पिपल्स- पार्टिसिपेशन’ हेमॉडेल सुरू केले आहे. या मॉडलेमध्ये लोकांचा सहभाग हा महत्वपूर्ण असा ठरणार आहे. यापुढे जलसंधारणाच्या कामांसाठी एखाद्या समूहाने सामाजिक दायित्वनिधीतून (सीएसआर) 45 टक्के निधी गुंतवल्यास उर्वरित 55 टक्के निधी शासन गुंतवणार आहे. या माध्यमातून जलसंधारणाची कामे मोठ्या प्रमाणावर होऊनग्रामविकास साधला जाणार आहे. मागील तीन वर्षांत 25 हजार गावे दुष्काळाने होरपळली होती. त्यानंतर राबविण्यात आलेल्या जलयुक्त शिवार अभियानामुळे त्यातटप्या-टप्याने घट झाली आहे. जानकी देवी बजाज ग्राम विकास संस्थेने केवळ दुष्काळमुक्ती हा उद्देश ठेवून कार्यास सुरूवात केली नसून त्यांनी रोजगारउपलब्धीवरही भर दिला असल्याचे त्यांनीसांगितले.जानकीदेवी बजाज ग्रामीण विकास संस्था स्वातंत्र्यपूर्व काळापासून सामाजिक दायित्वातून कार्य करत आहे. या संस्थेने हाती घेतलेल्या कामात शासनाची सर्वयंत्रणा आपल्या पाठिशी असेल. या संस्थेच्या जलसंधारणाची कामे इतरांसाठी आदर्श ठरतील असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.