रत्नागिरी, (आरकेजी) : रत्नागिरी जिल्हा परिषद प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी, पंचायत समितीचे पदाधिकारी, अधिकारी, कर्मचाऱ्यांनी श्रमदानातून वनराई बंधारा बांधत नागरिकांपुढे एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे. रत्नागिरी शहरानजिकच्या मिरजोळे पाडावेवाडी येथे बुधवारी प्रशासनातील अधिकारी, कर्मचार्यांनी श्रमदानातून सुमारे ५० फुट लांबीचा वनराई बंधारा बांधला.
ग्रमपंचायत स्तरावर वनराई बांधण्यासाठी यावर्षी सुमारे पाच हजाराहून अधिक बंधारे बांधण्याचे उद्दीष्ट जिल्हा परिषद प्रशासनाने डोळ्यासमोर ठेवलेले आहे. लोकांच्या खांद्याला खांदा लावण्यासाठी प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी या बंधारे बांधण्याच्या मोहिमेत आज श्रमदानासाठी उतरत असल्याने लोकांनाही या मोहिमेला प्रोत्साहित करण्यासारखे ठरणारे आहे. जिल्हा परिषद प्रशासन, रत्नागिरी पंचायत समिती व येथील मिरजोळे ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने श्रमदानातून वनराई बांधण्याचा उपक्रम बुधवारी मिरजोळे पाडावेवाडी येथे राबवण्यात आला.
येथील नदीवर सकाळी बंधारा बांधण्याच्या कार्यवाहीला सुरूवात झाली. जिल्हा परिषद प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी, पंचायत समिती पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी तसेच ग्रमपंचायतीचे पदाधिकारी, सदस्य, कर्मचारी अशा सार्यांनीच त्यात हिरहिरीने सहभाग घेतला. त्यामुळेच अवघ्या दोन तासात सुमारे ५० फुट लांबीचा वनराई बंधारा बांधून पूर्ण करण्यात आला.
त्यामध्ये रत्नागिरी पंचायत समितीचे उपसभापती सुनील नावले, जि.प.चे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ बामणे, मिरजोळे ग्रमपंचायत सरपंच गजानन गुरव, जि.प.मुख्य लेखा व वित्त अधिकारी मारुती कांबळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी(ग्रा.पं.) विश्वास सिद, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (साप्र) शेखर सावंत, कृषी विकास अधिकारी पंढरीनाथ देशमुख, कार्यकारी अभियंता बांधकाम विभाग चिपळूणचे चंद्रकांत मरपल्लीकर, कार्यकारी अभियंता बांधकाम रत्नागिरीचे जे.आर.शिंदे, उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी शिवप्रसाद खोत, सहाय्यक गटविकास अधिकारी तुकाराम जाधव, पं.स.सदस्या विभांजली पाटील, मिरजोळेचे माजी उपसरपंच तथा विद्यमान सदस्य महेश पाटील, ग्रा.पं.सदस्य शुभांगी पंडये, सुचिता नाचणकर, गंधाली मयेकर, पूनम पाडावे, तंटामुक्ती अध्यक्ष विठोबा पाटील, ग्रमसेवक पी.डी.सावंत, तसेच ग्र.पं.कर्मचारी, ग्रमस्थ यांची मोलाची उपस्थिती होती.
आगामी उन्हाळ्यात भेडसावणारी पाणीटंचाई ही दरवर्षीची समस्या आहे. एकीकडे प्रशासनस्तरावरून जिल्हाभरात कच्चे बंधारे बांधण्यासाठी लोकसहभागतून प्रयत्न केले जात आहेत. अशावेळी प्रशासनातील अधिकारी, कर्मचारीही या मोहिमेत सहभागी होत असल्याने ग्रामस्थानाही यातून प्रेरणा मिळत आहे.