
ठाणे, 11 मे : कोरोनाच्या संकटामुळे लॉकडाऊन असल्याने नागरिकांना अन्नधान्याचा तुटवडा निर्माण होऊ नये, यासाठी सरकारने रेशनींग दुकानावर मुबलक धान्य उपलब्ध करून दिला आहे. परंतु, नागरिकांना धान्य घेण्यासाठी दूरवर जावे लागत होते याची दाखल घेऊन स्थानिक नगरसेवक विकास रेपाळे व वृक्ष प्राधिकरण समिती सदस्या नम्रता भोसले यांच्या प्रयत्नाने नागरिकांच्या सोयीसाठी परबवाडी येथे रेशनींगचे उपकेंद्र सुरु करण्यात आले आहे.
नौपाडा येथील समर्थ भांडार येथे असलेल्या रेशनींग दुकानांत ७० टक्के रेशन धारक हे ठाणे महापालिका प्रभाग क्र-१९ परबवाडी,धर्मवीरनगर,साठेवाडी व प्रादेशिक मनोरुग्नालय परिसरात राहतात. परंतु, या नागरिकांना रेशन घेण्यासाठी पूर्व द्रुतगती महामार्ग ओलांडून नौपाडा येथे जावे लागत होते. नागरिकांना प्रत्येकी सुमारे १० ते २० किलो रेशन घेऊन उन्हातुन येणे शक्य होत नव्हते. नागरिकांची हि समस्या जाणून घेऊन ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे महापालिका शिक्षण मंडळ सभापती, नगरसेवक विकास रेपाळे यांच्या संकल्पनेतून व वृक्ष प्राधिकरण समिती सदस्या नम्रता भोसले यांच्या प्रयत्नाने समर्थ भंडार संचालित रेशनींग दुकानाचे उपकेंद्र ठाणे महापालिका शाळा क्रमांक- १८ येथे सुरु करण्यात आले आहे. यासाठी समर्थ भंडार संचालक अभिजीत चव्हाण यांचे विशेष सहकार्य लाभले. हे उपकेंद्र याठीकाणी कायमचे राहावे यासाठी नगरसेवक विकास रेपाळे व वृक्षप्राधिकरण सदस्य नम्रता भोसले यांनी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर व शिधावाटप उपनियंत्रक नरेश वंजारी यांची भेट घेऊन सदरचे उपकेंद्र कायमचे याठिकाणी ठेवण्याची मागणी केली.त्यांची हि मागणी मान्य करत सदरचे उपकेंद्र कायमचे याठिकाणी राहणार आहे. यानिर्णयामुळे नागरिकांची गरसोय कायमची दूर झाली आहे.
नागरिकांना रेशनींगवरील धान्य घेण्यासाठी २ किलोमीटर चालत जावे लागत होते तेसच कोरोनाचा वाढत संसर्ग लक्षात घेऊन नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने सदरचे रेशनींग दुकान नागरिकांच्या सोयीसाठी ठाणे महापालिका शाळा क्रमांक -१८ मध्ये सुरु करण्यात आले यामुळे नागरिकांची गैरसोय दूर झाल्याने आतापर्यंत मोठ्या संख्येने या रेशनींग उपकेंद्रातून नागरिकांनी धान्य घेतले असून यासाठी प्रयत्न करणारे नगरसेवक विकास रेपाळे व वृक्ष प्राधिकरण समिती सदस्या नम्रता भोसले यांचे नागरिकांनी आभार मानले आहेत