डोंबिवली, (प्रशांत जोशी) : मानपाडा येथील गांधीनगर नाल्यावरील सागाव पूलाच्या रुंदीकरणाचे काम अर्धवट झाले असून पूलावरील महावितरण कंपनीच्या अतिउच्च दाबाच्या वीज वाहिन्या कोण स्थलांतरीत करणार, यावरुन महावितरण, ठेकेदार व सार्वजनिक विभागाचे अधिकारी यांच्यात वाद निर्माण झाला होता. यामुळे पुलाचे काम अर्धवट झाले होते. अखेर आता पूलावरील अतिउच्च वाहिन्या ठेकेदाराला वाढीव काम देऊन पावसाळ्यानंतर काम पुन्हा सुरु करण्यात येणार आहे. यामुळे सागाव पूलाच्या रुंदीकरणाच्या कामाचा तिढा अखेर सुटणार आहे.
सागाव येथील गांधीनगर नाल्यावरील १० मीटर रुंद असलेला पूल धोकादायक झाला होता. हा पूल आता 16 मीटर रुंद होणार असून यामुळे मानपाडा रस्त्यावर होणारी वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे.