रत्नागिरी (आरकेजी)- रत्नागिरी एसटी स्थानकाच्या पुनर्बांधणीवर १० कोटी रुपये निधी खर्च करण्यात येणार आहे. यामुळे एसटी स्थानकाचे रुपडे पालटणार आहे. यामुळे सुसज्य बस स्थानक विकासात माईलस्टोन ठरले, अशी ग्वाही खासदार विनायक राऊत यांनी दिली. तर ग्रामीण भागासाठी एसटी जीवनवाहीनी असल्याचे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र वायकर यांनी केले.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, रत्नागिरी येथील मध्यवर्ती बसस्थानकाच्या पुर्नबांधणीचे भुमिपुजन आज पालकमंत्री रविंद्र वायकर यांच्या हस्ते झाले त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा स्वरुपा साळवी, खासदार विनायक राऊत, म्हाडाचे अध्यक्ष आमदार उदय सामंत, आमदार राजन साळवी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आंचल गोयल, रत्नागिरीचे नगराध्यक्ष राहुल पंडीत, राजेंद्र महाडिक, बंडया साळवी आदि मान्यंवर उपस्थित होते. पालकमंत्री यावेळी म्हणाले ग्रामीण भागाच्या दैनदिन जीवनात एसस्टी एक अनन्य साधारण महत्व आहे. एसटी म्हणजे ग्रामीण भागातील रक्तवाहीनीच आहे आहे आणि चालक चालक ती सुस्थितीत ठेवण्याचे काम करतात. ग्रामीण भागातील रस्ते चांगल्या तऱ्हेचे व्हावे यासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनांसारख्या योजनांतून ८ हजार किमी लांबीच्या रस्त्यांचे काम करण्यात येत आहे. रत्नागिरी येथील पुर्नबांधणी करण्यात येत असलेल्या बसस्थानकाबद्दल बोलताना ते म्हणाले सर्व सुख सोयीने सज्ज असे बस स्थानक येथे बांधण्यात येत असून यासाठी परिवहन मंत्र्याच्या माध्यमातून १० कोटी रुपये एवढा निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. या बसस्थानकामध्ये शहरी वाहतूकीसाठी 10 ते ग्रामीण वाहतूकीसाठी 12 फलाट असणार आहे. यामध्ये आरक्षण कक्ष, हिरकणी कक्ष, महिला कर्मचारी विश्रांतीगृह, वाहतूक नियंत्रण कक्ष, चालक वाहक विश्रांतीगृह, पार्सल कक्ष, पिण्याच्या पाण्याची टाकी, आग प्रतिबंधक उपाययोजना, प्रवाशांसाठी आत व बाहेर जाण्यासाठी स्वतंत्र मार्गिका, प्रंवाशासाठी स्वंतत्र पार्कींग व्यवस्था व उपहारगृह, दिव्यांग प्रवाशांसाठी स्वंतत्र स्वच्छतागृह, वायफाय, पिण्याच्या पाण्याच्या व्यवस्था इ. अशा सर्व सोयीसुविधा यामध्ये आंतर्भाव असणार असल्याचे त्यांनी सांगितले. लांजा बस स्थानकाचेही देखील लवकरच भूमिपुजन होणार आहे. आपण सर्व कामगार एकत्र असाल तर आपल्या सर्व समस्या दूर होऊ शकतात , त्या सोडविण्या आपण सर्वोतपरी प्रयत्न करु असे त्यांनी यावेळी सांगितले. याप्रसंगी खासदार विनायक राऊत म्हणाले सर्व सुख सोयीने सुसज्य होणारे हे बस स्थानक रत्नागिरी जिल्हयाच्या विकासात माईलस्टोन ठरेल. जिल्हयातील जास्ती जास्त जनता ही एसटी ने प्रवास करत असते त्यांचा प्रवास किंवा प्रवासासाठी येणाऱ्या प्रवाशांसाठीचे बसस्थानकांतील वातावरण सुखकारक असावे यासाठी परिवहन मंत्रीं दिवाकर रावते यांच्या संकल्पनेतून सर्व सुख सोयीने सुसज्ज असे बसस्थानक चिपळूण ते सावंतवाडी या दरम्यान शासनाच्या निधीतून करण्यात येत असून यासाठी आवश्यक निधी त्यांच्या माध्यमातून उपलब्ध झाली आहे. तरी रत्नागिरी बस स्थानकांचे काम विहित मुदतीत ठेकेदारांनी करावे अशा सूचनाही त्यांनी यावेळी संबधिताना दिल्या.
याप्रसंगी पालकमंत्री रविंद्र वायकर यांच्या हस्ते आधुनिक सुखसोयीने सज्ज अशा बसचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी विविध विभागाचे अधिकारी, एसटी विभागाचे अधिकारी, कर्मचारी आणि लोक मोठया संख्येने उपस्थित होते.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, रत्नागिरी येथील मध्यवर्ती बसस्थानकाच्या पुर्नबांधणीचे भुमिपुजन आज पालकमंत्री रविंद्र वायकर यांच्या हस्ते झाले त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा स्वरुपा साळवी, खासदार विनायक राऊत, म्हाडाचे अध्यक्ष आमदार उदय सामंत, आमदार राजन साळवी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आंचल गोयल, रत्नागिरीचे नगराध्यक्ष राहुल पंडीत, राजेंद्र महाडिक, बंडया साळवी आदि मान्यंवर उपस्थित होते. पालकमंत्री यावेळी म्हणाले ग्रामीण भागाच्या दैनदिन जीवनात एसस्टी एक अनन्य साधारण महत्व आहे. एसटी म्हणजे ग्रामीण भागातील रक्तवाहीनीच आहे आहे आणि चालक चालक ती सुस्थितीत ठेवण्याचे काम करतात. ग्रामीण भागातील रस्ते चांगल्या तऱ्हेचे व्हावे यासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनांसारख्या योजनांतून ८ हजार किमी लांबीच्या रस्त्यांचे काम करण्यात येत आहे. रत्नागिरी येथील पुर्नबांधणी करण्यात येत असलेल्या बसस्थानकाबद्दल बोलताना ते म्हणाले सर्व सुख सोयीने सज्ज असे बस स्थानक येथे बांधण्यात येत असून यासाठी परिवहन मंत्र्याच्या माध्यमातून १० कोटी रुपये एवढा निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. या बसस्थानकामध्ये शहरी वाहतूकीसाठी 10 ते ग्रामीण वाहतूकीसाठी 12 फलाट असणार आहे. यामध्ये आरक्षण कक्ष, हिरकणी कक्ष, महिला कर्मचारी विश्रांतीगृह, वाहतूक नियंत्रण कक्ष, चालक वाहक विश्रांतीगृह, पार्सल कक्ष, पिण्याच्या पाण्याची टाकी, आग प्रतिबंधक उपाययोजना, प्रवाशांसाठी आत व बाहेर जाण्यासाठी स्वतंत्र मार्गिका, प्रंवाशासाठी स्वंतत्र पार्कींग व्यवस्था व उपहारगृह, दिव्यांग प्रवाशांसाठी स्वंतत्र स्वच्छतागृह, वायफाय, पिण्याच्या पाण्याच्या व्यवस्था इ. अशा सर्व सोयीसुविधा यामध्ये आंतर्भाव असणार असल्याचे त्यांनी सांगितले. लांजा बस स्थानकाचेही देखील लवकरच भूमिपुजन होणार आहे. आपण सर्व कामगार एकत्र असाल तर आपल्या सर्व समस्या दूर होऊ शकतात , त्या सोडविण्या आपण सर्वोतपरी प्रयत्न करु असे त्यांनी यावेळी सांगितले. याप्रसंगी खासदार विनायक राऊत म्हणाले सर्व सुख सोयीने सुसज्य होणारे हे बस स्थानक रत्नागिरी जिल्हयाच्या विकासात माईलस्टोन ठरेल. जिल्हयातील जास्ती जास्त जनता ही एसटी ने प्रवास करत असते त्यांचा प्रवास किंवा प्रवासासाठी येणाऱ्या प्रवाशांसाठीचे बसस्थानकांतील वातावरण सुखकारक असावे यासाठी परिवहन मंत्रीं दिवाकर रावते यांच्या संकल्पनेतून सर्व सुख सोयीने सुसज्ज असे बसस्थानक चिपळूण ते सावंतवाडी या दरम्यान शासनाच्या निधीतून करण्यात येत असून यासाठी आवश्यक निधी त्यांच्या माध्यमातून उपलब्ध झाली आहे. तरी रत्नागिरी बस स्थानकांचे काम विहित मुदतीत ठेकेदारांनी करावे अशा सूचनाही त्यांनी यावेळी संबधिताना दिल्या.
याप्रसंगी पालकमंत्री रविंद्र वायकर यांच्या हस्ते आधुनिक सुखसोयीने सज्ज अशा बसचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी विविध विभागाचे अधिकारी, एसटी विभागाचे अधिकारी, कर्मचारी आणि लोक मोठया संख्येने उपस्थित होते.