रत्नागिरी, प्रतिनिधी : रात्रभर पडलेल्या मुसळधार पावसामुळे रत्नागिरी तालुक्यातील टेंभ्ये गावात पुरजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. एनडीआरएफची रात्रीही या ठिकाणी हजर होती, सध्या एनडीआरएफचीकडून या पुरजन्य भागाची पाहणी सुरू आहे.
रात्रभर पावसाची संततधार सुरू होती. त्यामुळे टेंभ्ये आणि पोमेंडी या गावांना जोडणा-या पुलावरुन पाणी जात होतं, त्यामुळे हा रस्ता बंद करण्यात आला होता. मात्र या रस्त्यावरुन जाण्याचा प्रयत्न करणा-या दोन बाईक वाहून गेल्या तर एक नँनो वाहून गेली. सुदैवानं यात कोणतीही जिवीतहानी झालेली नाही. एनडीआरएफच्या टीमने बाईकस्वारांना वाचवलं. पाण्याचा स्पीड एवढा होता की रस्त्याच्या बाजूचा भाग पुर्णपणे वाहून गेला.पाण्याच्या प्रवाहात नँनो अडकल्यानं ती देखील वाहून गेली. सकाळी देखील एनडीआरएफ च्या टीमने या भागाची पाहणी केली कोणता अनुचित प्रकार घडला नाही ना…कुणी अडकलं नाही ना याची खात्री केली…सध्या एनडीआरएफचं पथक पुरजन्य भागाची पाहणी करत आहे. ज्या भागात पुरजन्य परिस्थिती निर्माण होते त्या भागातील नागरीकांनी काळजी घ्यावी.रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करुन धाडस करु नये असं आवाहन एनडीआरएफ कडून करण्यात आलं आहे.