रत्नागिरी : आदर्श आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी व खर्चावर नियंत्रण ठेवणे, आर्थिक बळाचा दुरुपयोग टाळणे, मतदारावर प्रभाव टाकण्याऱ्या वस्तूंच्या वाटपावर अंकुश ठेवण्यासाठी करावयाच्या उपायोजनांसाठी जिल्हाधिकारी प्रदीप पी. यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक संनियंत्रण समिती स्थापन करण्यासाठी आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न झाली.
यावेळी जिल्हापरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, जिल्हा पेालीस अधिक्षक प्रणय अशोक, अपर जिल्हाधिकारी बाबासाहेब बेलदार, निवासी उपजिल्हाधिकारी सारंग कोडोलकर तसेच विविध विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.