
रत्नागिरी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या लॉकडाऊन सुरू आहे. लॉकडाऊनचा तिसरा टप्पा सुरू झाला आहे. मात्र, लॉकडाऊनमुळे परराज्यातील अनेक मजूर ठिकठिकाणी अडकले आहेत. महाराष्ट्रातही असे हजारो मजूर अडकले आहेत. सध्या त्यांना त्यांच्या राज्यात जाण्यासाठी सरकारकडून विशेष व्यवस्था करण्यात येत आहे. दरम्यान, रत्नागिरी जिल्ह्यातही मध्य प्रदेशातील मजूर आपल्या गावी जाता यावे म्हणून वारंवार मागणी करत होते. अखेर, या मजुरांसाठी पनवेल येथून ट्रेन सोडण्यात येणार आहे. त्यामुळे मजुरांना रत्नागिरी जिल्ह्यातून पनवेलपर्यंत जाण्यासाठी एसटीने सोय केली आहे. त्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यात आज सकाळी 7 वाजल्यापासून 30 गाड्या सोडण्यात आल्या आहेत. यामध्ये रत्नागिरी, राजापूर, खेड, चिपळूण येथील डेपोतून बसेस सोडण्यात आल्या.
एका बसमध्ये 22 मजूर याप्रमाणे 30 गाड्या जिल्ह्यातून सुटत असल्याची माहितीही विभाग नियंत्रक सुनील भोकरे यांनी दिली आहे. पनवेल रेल्वे स्टेशन पर्यंत या गाड्या मजुरांना सोडून येणार आहेत.