रत्नागिरी (आरकेजी): शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी राज्य सरकारने ‘छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना’ सुरू केली आहे. योजनेला दोन महिन्याचा कालावधी ही उलटून गेला. मात्र अद्याप शेतकरी कर्जमुक्तीचा निर्णय घेतला जात नसल्याने शिवसेनेने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला. दसऱ्यापूर्वी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा, अशी जोरदार मागणी केली. यावेळी मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.
कर्जमाफी मिळत नसल्याने अनेक अडचणींचा सामना करावा लागतो आहे. मात्र शासनाने याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. कर्जमाफी होत नसल्याने राज्यात आत्महत्यांचे प्रमाण वाढत आहे. आत्महत्या रोखण्यासाठी सरकारने सरसकट कर्जमुक्ती द्यावी, अशी शिवसेनेची मागणी आहे. राज्यात विविध ठिकाणी याच मागणीसाठी सरकारविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयांवर मोर्चा काढण्यात आला. दसऱ्यापूर्वी कर्जमुक्ती करावी आणि शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा, अशा मागणीचे निवेदन यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.
शिवसेना जिल्हा कार्यालय आठवडा बाजार येथून या मोर्चाला सुरुवात झाली. शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंद्रजी महाडीक व सचिनजी कदम यांच्या नेतृत्वाखाली या मोर्चा काढण्यात आला. याप्रसंगी राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजन साळवी, चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सदानंद चव्हाण, उप जिल्हाप्रमुख जगदीश राजापकर, रत्नागिरी शहर उप जिल्हाप्रमुख संजय साळवी, बाळा कदम, युवासेनेचे योगेश कदम, विधानसभा क्षेत्रप्रमुख जया माने,प्रमोद शेरे, रत्नागिरी तालुकाप्रमुख प्रदीप साळवी, संगमेश्वर तालुकाप्रमुख प्रमोद पवार, राजापूर तालुकाप्रमुख प्रकाश कुवळेकर, लांजा तालुकाप्रमुख संदीप दळवी, चिपळूण तालुकाप्रमुख प्रतापराव शिंदे, जि.प अध्यक्ष स्नेहा सावंत, जि.प अर्थ आणि शिक्षण सभापती दीपक नागले, महिला व बालकल्याण सभापती सौ खांडेकर, जिल्हा बँकेचे किरणशेट सामंत, गणेश लाखण, लांजा सभापती दीपाली दळवी, राजापूर सभापती सुभाष गुरव, शहरप्रमुख लांजा गुरुप्रसाद, बिपीन बंदरकर, जिल्हा महिला आघाडी शिल्पाताई सुर्वे, राजापूर महिला आघाडी योगिता साळवी,सर्व जि.प सदस्य व सर्व सभापती,सर्व पं.स सदस्य, सर्व सभापती, जिल्हाचे सर्व शहर प्रमुख, उपशहर प्रमुख, विभाग प्रमुख ,उपविभाग प्रमुख, शाखाप्रमुख, उपशाखाप्रमुख गटप्रमुख, सर्व नगरसेवक, नगरसेविका, शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.