
रत्नागिरी : अतिवृष्टीच्या शक्यतेमुळे रत्नागिरी जिल्ह्यातील शाळांना सोमवारी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार सोमवार दिनांक ५ ऑगस्ट रोजी देखील जिल्ह्यात अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व शाळा-महाविद्यालयांना दिनाक 5 ऑगष्ट रोजी सुट्टी जाहीर केली आहे.