मुंबई : राज्य मध्यवर्ती कर्मचारी संघटनेने आपल्या विविध मागण्यांसाठी तीन दिवसांच्या (7 ते 9 ऑगस्ट) पुकारलेल्या संपात जिल्हा परिषदेचे कर्मचारी, सरकारी रुग्णालयांच्या कर्मचाऱ्यांचा संप आजपासून सुरू झाला.
संपाला आज संमिश्र प्रतिसाद मिळाला. येत्या दोन दिवसात राज्याच्या प्रशासकीय कामावर परिणाम दिसण्याची शक्यता आहे.
कर्मचाऱ्यांच्या मागण्या
– सातव्या वेतन आयोगाची तत्काळ अंमलबजावणी
– बालसंगोपनाची रजा दोन वर्षे मिळावी
– पाच दिवसांचा आठवडा करावा
– अनुकंपाद्वारे कर्मचाऱ्यांची लवकर भर्ती करणे
– सरकारी कर्मचाऱ्यांची भर्ती पुन्हा सुरू करावी
– निवृत्तीचे वय वाढविण्यात यावे