रत्नागिरी, प्रतिनिधी : तौक्ते चक्रीवादळाच्या पाहणीसाठी आलेल्या केंद्राच्या पथकावर माझा काडीमात्र विश्वास नाही, अशी टीका खासदार विनायक राऊत यांनी केली आहे. ते आज रत्नागिरीत बोलत होते.
केंद्रीय पथकाने नुकताच जिल्ह्यात तौक्ते चक्रीवादळाने झालेल्या नुकसानीचा पाहणी दौरा केला. याबाबत बोलताना खासदार विनायक राऊत म्हणाले की,
निसर्ग चक्रीवादळाच्यावेळी पाहणीसाठी आलेल्या केंद्रीय पथकाने कोकणवासियांच्या तोंडाला पाने पुसली. आता आलेलं शिष्टमंडळही तसंच आहे.. आता तौक्ते चक्रीवादळाशी संघर्ष करुन कोकणातील जनता स्थिरस्थावर झाली. राज्य सरकार आणि जिल्हा प्रशासनाने त्यांचं जीवन सुरळीत केलं. त्यामुळे आता आलेल्या समितीला काही दिसलं नाही तर तसे ते रीमार्क देणार, आणि त्याचा फार काही फायदा होईल असं मला वाटत नाही, असं शिवसेना खासदार विनायक राऊत यावेळी म्हणाले.