
रत्नागिरी : नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात आज रत्नागिरीत आम्ही भारतीय नागरिक तर्फे महामोर्चाचे
आयोजन केले होते. या महामोर्चासाठी हजारोंच्या संख्येने संगमेश्वर, रत्नागिरी, लांजा, राजापूर तालुक्यांतील सर्व धर्मीय नागरिक सहभागी झाले होते. सुरूवातीला चंपक मैदानात मोठ्या प्रमाणावर जमलेल्या जनसमुदायाला विविध नेत्यांनी मार्गदर्शन केले. त्यामध्ये विविध पक्षाचे नेते सहभागी झाले होते. यावेळी सर्वच नेत्यांनी केंद्र सरकारने देशवासियांवर लादलेल्या कायद्याला विरोध केला. यामध्ये आसिफ सिद्दीकी, खा. हुसेन दलवाई, माजी कुलगुरू भालचंद्र मुणगेकर, राष्ट्रवादीचे कुमार शेट्ये, मिलिंद कीर, बशीर मुर्तुझा, सामाजिक कार्यकर्ते अभिजित हेगशेट्ये, नेते आदी मंडळी सहभागी झाली होती.
त्यानंतर हा विराट मोर्चा चंपक मैदानापासून निघून जिल्हाधिकारी कार्यालयावर आला. तेथे मोर्चाच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर केले. या मोर्चात सर्व समाजातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले असले तरी मुस्लिम बांधवांचा सहभाग मोठ्या प्रमाणावर होता. मात्र या मोर्चाचे आयोजन आम्ही भारतीय नागरिक या संघटनेच्यावतीने करण्यात आला होतं. मोर्चाच्यावेळी कोणालाही असुविधा निर्माण होणार नाही अथवा धर्म अथवा व्यक्तीच्या भावना दुखावणार नाही याची काळजी घेण्याच्या सुचना देण्यात आल्या होत्या. त्यामुळे मोठ्या संख्येने उपस्थिती असूनही मोर्चा शांततेत पार पडला. मोर्चेकर्यांच्या संख्येमुळे जयस्तंभ परिसर फुलून गेला होता. शेवटी मोर्चेकर्यांनी जयस्तंभाला वळसा घालून परतण्यास सुरूवात केली. यावेळी मोर्चाच्या स्वयंसेवकांनीही चांगली भूमिका बजावली. त्यांनी ट्रॅफीक सुरळीत होण्यासाठी पोलिसांना सहकार्य केले. तरीही सुरक्षिततेचा उपाय म्हणून पोलिसांनी काही विभागातील ट्रॅफीक थांबवून ठेवल्यामुळे काही भागात त्यावेळी काही वेळ ट्रॅफीक जाम झाले होते. मोर्चेकर्यांसाठी पाण्याच्याही सुविधा विविध संघटनांनी उपलब्ध करून दिल्या होत्या. तसेच रस्त्यावर पडलेल्या बाटल्याही कार्यकर्त्यांनी उचलून रस्ता स्वच्छ करून दिला. त्यामुळे शिस्तबद्ध पद्धतीने झालेल्या या मोर्चामध्ये युवक मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले होते.
एकतेचा नारा
यावेळी आणि संपूर्ण परिसरात घोषणाबाजी सुरू होती हम सब एक है आजादी लेके ही रहेंगे अशा विविध घोषणा देत सारा परिसर दणाणून गेला होता. यावी प्रत्येक मुस्लिम बांधवांच्या असतात तिरंगा झेंडा पाहायला मिळत होता आम्ही या देशाचे नागरिक असून आम्हाला उध्वस्त करणारा कायदा तत्काळ रद्द करा मागणी अनेक मुस्लीम बांधव करीत होते.
हे तर ऐक्याचे प्रतीक
मोर्चा पूर्वी उद्योग नगर परिसरातील चंपक मैदान येथे एक सभा पार पडली या सभेत बोलताना खासदार हुसेन दलवाई यांनी नागरिकत्व कायद्याविरोधात हिंदू-मुस्लीम सर्वच एकत्र येऊन विरोध करत आहे खरंतर ऐक्याचे प्रतीक असून देशात सुरू असलेली हुकूमशाही लवकरच हद्दपार होईल, असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला.
संविधानाचे उल्लंघन…
आपला देश लोकशाहीवर आधारित असून देशातील प्रत्येक नागरिक समान आहे . देशात धर्म , जात , वंश , व वर्ण इ . आधारे भेदभाव करणे म्हणजेच भारताच्या संविधानाचे उल्लंघन आहे असा आरोप देखील खा. दलवाई यांनी केला.
काऊंट डाऊन सुरू
यावेळी आमदार हुस्नबानू खलिफे यांनी यांनी केंद्र सरकारवर सडकून टीका केली या सरकारचे काउंटडाऊन सुरू झाले केंद्र सरकार आता हद्दपार होणार आहे. विद्यार्थी संघटना देखील रस्त्यावर उतरले वेळोवेळी या सरकारने मुस्लिम समाजावर घाला घातला मात्र आम्ही गप्प बस आता तर आमच्या जगण्यावर घाला घालण्याचे काम केंद्र सरकारने केला आहे या सरकारचे दिवस भरले ते सांगत सरकारवर हल्लाबोल केला.
निवेदन सादर
यावेळी आम्ही भारतीय नारी नागरिक या संघटनेच्या वतीने जिल्हाधिकार्यांना निवेदन देण्यात आले.केंद्र सरकारनं देशात आणलेला CAA( नागरिकत्व सुधारणा कायदा ) हा पर्यावर आधारित असल्याने असंविधानिक आहे . तसेच जागतिक मानवी हक्काच्या ( UDHR ) विरोधात आहे . त्यामुळे ” आम्ही भारतीय नागरीक आमचा या कायद्याला विरोध आहे . INCR माध्यमातून सरकार पुन्हा एकदा देशातील गरीब जनतेला रांगेत उभे करून वेठीस धरण्याचा प्रयत्न करीत आहेत कागद पत्राच्या असणाऱ्या एखाद्या छोट्याश्या त्रुटीमुळे देशातील करोडो लोकांना त्रास होणार आहे असे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.