मुंबई: मुंबईतील आगीचे सत्र थांबण्याचे नाव घेताना दिसत नाही. सोमवारी (८ जाने.) सकाळी साडे सातच्या सुमारास कर्मवीर भाऊराव मार्गावर असलेल्या मुंबई सत्र न्यायालयमध्ये आग लागली. सत्र न्यायालयाच्या तिसऱ्या मजल्यावर आग लाग लागल्याने यात अनेक फाईल जळून खाक झाल्या. मात्र, सकाळची वेळ आल्याने सुदैवाने कोणतीही जिवितहानी झाली नाही.
नव्या वर्षाच्या प्रारंभीपासून आगी लागण्याच्या वाढीस लागल्या आहेत. येत्या आठवडाभरात सात आगीच्या घटना घडल्या असून त्यात पाच जण मृत झाले आहेत. सोमवारी सत्र न्यायालयाच्या तिसऱ्या मजल्यावर आग लागली. आगीत काही महत्वाच्या फाईल जळाल्या. या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी सहा बंब घेवून घटनास्थळी धाव घेत आग नियंत्रणात आणली. त्यामुळे सुदैवाने दुर्घटना टळली.