मुंबई, (निसार अली) : मुंबई महानगर पालिकेच्या जल विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा कोल्हापूरच्या महापौर माधवी गवंडी यांच्या हस्ते स्मृतीचिन्हं, पुस्तक व रोप देउन सत्कार करण्यात आला. मुंबई पालिका आयुक्त प्रवीण परदेशींच्या आदेशाने कोल्हापूर आणि सांगलीत महापुराच्या संकटाच्या वेळी धावत जाऊन सांगली व कोल्हापूरचा पाणीपुरावठा पूर्ववत केला.
दिनांक 13ऑगस्ट रोजी मुंबईहून सांगलीत व तिथून पालिका आयुक्तांच्या आदेशाने कोल्हापूर महापालिकेच्या पंपिंग स्टेशनला जाऊन तेथील पंप आणि मोटारींची सतत तीन दिवस अहोरात्र मेहनत घेत दुरुस्ती करून पाणी पुरवठा यंत्रणा पूर्ववत केल्या. यामुळे 15 दिवसांनंतर कोल्हापूर शहरात पाण्याची यंत्रणा पूर्ववत झाली.
मुंबई महानगर पालिकेचे जल विभागाचे अभियंते राजेश ताम्हाणे, सहायक अभियंता जीवन पाटील, यांत्रिकीचे शंकर कचरे, राजेश रोड्रिक्स, चालक जीवराज सोसाउच्चन, मदतनीस उल्हास शिर्सेकर, वाहनचालक राजेश सुर्वे, राजेंद्र कुमार पेडणेकर यांचा सत्कार करण्यात आला यावेळी कोल्हापूर महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी उपस्थित होते.