
*ठाणे- दिवा अप आणि डाउन धीम्या मार्गावर सकाळी ११.०० ते सायंकाळी ४.०० पर्यंत*
मुलुंड येथून सकाळी १०.४३ ते दुपारी ३.४६ पर्यंत सुटणारी डाउन मार्गावरील धिमी/अर्धजलद सेवा मुलुंड आणि दिवा स्थानकांदरम्यान डाउन जलद मार्गावर वळविण्यात येऊन ठाणे, दिवा स्थानकांवर थांबतील आणि वेळापत्रकापेक्षा १० मिनिटे उशिराने गंतव्यस्थानावर पोहोचतील.
कल्याण येथून सकाळी १०.३७ ते दुपारी ३.४१ पर्यंत सुटणाऱ्या अप धिमी/अर्धजलद सेवा दिवा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर वळविल्या जाऊन दिवा व ठाणे स्थानकांवर थांबतील आणि पुढे मुलुंड स्थानकावर अप धिम्या मार्गावर पुन्हा वळवण्यात येतील व वेळापत्रकापेक्षा १० मिनिटे उशिराने गंतव्यस्थानावर पोहोचतील.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी ११.०० ते संध्याकाळी ५.०० दरम्यान सुटणाऱ्या/येणाऱ्या सर्व अप आणि डाउन धीम्या सेवांचे वेळापत्रकापेक्षा १० मिनिटे उशीराने आगमन होतील/सुटतील.
*पनवेल- वाशी अप आणि डाउन हार्बर मार्गावर सकाळी ११.०५ ते सायंकाळी ४.०५ पर्यंत*
*(बेलापूर- खारकोपर सेवा प्रभावित होणार नाहीत; नेरुळ- खारकोपर सेवा रद्द राहतील)*
पनवेल येथून सकाळी १०.४९ ते सायंकाळी ४.०१ पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईच्या दिशेने सुटणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा आणि
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथून सकाळी १०.०३ ते दुपारी ३.१६ या वेळेत पनवेल/बेलापूरसाठी सुटणाऱ्या डाउन हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.
पनवेल येथून सकाळी ९.०१ ते दुपारी ३.५३ पर्यंत ठाणेकरीता सुटणाऱ्या अप ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा आणि ठाणे येथून सकाळी १०.०१ ते दुपारी ३.२० या वेळेत पनवेलच्या दिशेने जाणारी डाउन ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.
नेरूळ येथून सकाळी १०.१५ ते दुपारी २.४५ या वेळेत खारकोपरला जाणारी डाउन मार्गावरील सेवा आणि सकाळी १०.४५ ते दुपारी ३.१५ या वेळेत नेरूळसाठी खारकोपर सुटणारी अप मार्गावरील सेवा रद्द राहतील.
ब्लॉक कालावधी दरम्यान बेलापूर आणि खारकोपर दरम्यान उपनगरीय ट्रेन सेवा वेळापत्रकानुसार चालतील.
ब्लॉक काळात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई – वाशी विभागात विशेष लोकल चालविण्यात येतील.
ब्लॉक कालावधी दरम्यान ठाणे-वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान ट्रान्स हार्बर मार्गावरील सेवा उपलब्ध असतील.
हे देखरेख मेगा ब्लॉक्स पायाभूत सुविधांची देखभाल आणि सुरक्षिततेसाठी आवश्यक आहेत. प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासन दिलगीर आहे.