रत्नागिरी : रत्नागिरीतील मिरकरवाडा बंदरातील मच्छिमारांच्या जाळ्यात भली मोठे वागळी (वाटू) मासळी मिळाल्याने मच्छिमारांच्या आनंदाला पारावार उरला नाही. या माशांचं वजन तब्बल 500 ते 600 किलो इतकं असल्याने हे मासे उचलण्यासाठी क्रेनचा वापर करण्यात आला.
जिल्ह्यातील हर्णेतील मच्छिमारांच्या जाळयात गेल्या काही दिवसांत मोठे आणि वेगळ्या प्रकारचे मासे मिळाले आहेत. या घटना ताज्या असताना आता रत्नागिरीतल्या मिरकवाडा येथील मच्छिमारांनाही याचा अनुभव आला. मच्छिमार रऊफ साखरकर व त्यांच्या सहकाऱ्यांच्यामारी नौकाना समुद्रा 4 भले मोठे वागळी (वाटू) मासे मिळाले. हे मासे जाळ्यातून काढताना मोठी कसरत करावी लागली. जवळपास 500 ते 600 किलो इतके वजन या माशांचं होतं. त्यामुळे ते उचलण्यासाठी क्रेनचा वापर करावा लागला. एवढे मोठे मासे मिळल्याचे समजताच अनेकांनी मिरकरवाडा जेटीवर गर्दी केली होती.