महाराष्ट्रात शुद्ध ऊर्जेचे प्रमाण चौपट करण्यासाठी हाती घेतला कॅप्टिव्ह सोलार प्लांट
मुंबई, २८ जुलै, २०२१: महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड ५८ मेगावॅट पीक क्षमतेचा कॅप्टिव्ह सोलार प्लांट हाती घेत आहे. २०२२ पासून या प्लांटमध्ये दरवर्षी जवळपास १०० मिलियन युनिट्स ऊर्जानिर्मिती केली जाईल अशी अपेक्षा आहे. महाराष्ट्रातील मराठवाड्यामध्ये परभणी जिल्ह्यात या सोलार प्लांटची उभारणी, मालकी आणि संचालन याची जबाबदारी रिन्यू सनलाईट एनर्जी प्रायव्हेट लिमिटेडकडे २५ वर्षांसाठी सोपवण्यात आली आहे. ही रिन्यू पॉवर प्रायव्हेट लिमिटेडची १००% मालकीची उपकंपनी आहे.
हा प्रकल्प म्हणजे नैसर्गिक परिस्थितीकी तंत्रांचे संरक्षण आणि पुनरुज्जीवन या दिशेने महिंद्रा अँड महिंद्राने उचललेले मोठे पाऊल आहे. यामुळे महाराष्ट्रात शुद्ध ऊर्जा निर्मितीमध्ये महिंद्रा अँड महिंद्राचे योगदान चार पटींनी वाढून १२% वरून ५६% वर पोहोचेल. महाराष्ट्रभरात मुंबई, नाशिक, पुणे, इगतपुरी आणि नागपूर याठिकाणी महिंद्रा अँड महिंद्रा शुद्ध ऊर्जा क्षेत्रात कार्यरत आहे. दरवर्षी कार्बन उत्सर्जनामध्ये ७९,००० टनांची घट करून कार्बन तठस्थता अर्थात कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण शून्यावर आणण्यासाठी आणि सायन्स बेस्ड टार्गेट्सप्रती लक्षणीय प्रगती करण्यासाठी ही कंपनी सज्ज आहे. हे म्हणजे दरवर्षी ३.७ मिलियन झाडांचे पोषण करण्यासारखे किंवा जवळपास २०,६५० भारतीय कुटुंबांना संपूर्ण वर्षभराचा वीज पुरवठा करण्यासारखे आहे.
या घोषणेबद्दल महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडचे ऑटोमोटिव्ह डिव्हिजनचे चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर श्री. वीजय नाक्रा यांनी सांगितले, “महिंद्रामध्ये पर्यावरणस्नेह, टिकाऊपणा ही जीवन पद्धती आहे आणि यालाच आम्ही यशाचे मापन करण्याचे प्रमुख परिमाण देखील मानतो. कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण शून्यावर आणण्याचे आमचे उद्धिष्ट २०४० सालापर्यंत साध्य करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत आणि त्यासाठी आमच्या सर्व उत्पादन संचालनांमध्ये कार्बन उत्सर्जन मोठ्या प्रमाणावर कमी करत आहोत. या नव्या कॅप्टिव्ह सोलार प्लांटमुळे पर्यावरणस्नेह आणि शाश्वततेच्या दिशेने सुरु असलेल्या आमच्या वाटचालीला अधिक वेग मिळेल, पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने हे लक्षणीय योगदान ठरेल तसेच २०२२ पर्यंत १७५ गिगावॅट्स सौर ऊर्जा निर्मिती क्षमता निर्माण करण्याच्या भारत सरकारच्या उद्धिष्टाला देखील हे एक पाठबळ ठरेल.”
उत्पादन केले जात असलेल्या आमच्या सर्व ठिकाणी कार्बन उत्सर्जन कमी करण्याची आणि शुद्ध ऊर्जा वापराची आमची वाटचाल इगतपुरी येथील ०.०६ मेगावॅट क्षमतेच्या आमच्या पहिल्या प्लांटपासून सुरु झाली आणि आता या कॅप्टिव्ह सोलार प्लांटमुळे आमची शुद्ध ऊर्जा क्षमता ७८ मेगावॅट पीक इतकी होईल. २०४० सालापर्यंत कार्बन तटस्थता साध्य करण्याच्या आमच्या उद्धिष्टांच्या आणि भारताच्या एनडीसी अर्थात नॅशनली डिटरमाईन्ड काँट्रीब्युशन्सना अनुसरून असलेली सायन्स बेस्ड टार्गेट्स स्विकारण्याच्या दिशेने उचललेले हे एक मोठे पाऊल आहे.
ईएसजी हा महिंद्राच्या डीएनएचाच एक भाग आहे. २०४० पर्यंत कार्बन उत्सर्जन शून्य करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत आणि त्यासाठी अनेक खास व सातत्यपूर्ण कार्यक्रम राबवत आहोत. ईपी १०० उपक्रमामार्फत आपली ऊर्जा उत्पादनक्षमता दुपटीने वाढवण्याची वचनबद्धता स्वीकारणारी जागतिक पातळीवरील पहिली कंपनी महिंद्रा अँड महिंद्रा होती. आमची सर्व ठिकाणे २०३० सालापर्यंत ‘शून्य कचरा अर्थात जिथे अजिबात काहीही कचरा निर्माण होत नाही’ अशी ठिकाणे म्हणून प्रमाणित केली जाण्यासाठी देखील आमची वचनबद्ध आहोत. आमच्या हरियाली उपक्रमांतर्गत आम्ही दरवर्षी ५ मिलियन झाडे लावतो. १९ मिलियनपेक्षा जास्त झाडे याआधीच लावली गेली आहेत.