चिपळूण : खरीप भात लागवडीच्या अनुषंगाने करोना पार्श्वभूमीवर भात शेतीचे नियोजन कसे करावे यासाठी भात सशोधन केंद्र , शिरगाव रत्नागिरी , महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्ंनती अभियान, रिलायन्स फाउंडेशन रत्नागिरी, व पंचायत समिति , चिपळूण यांच्या सयुक्त विद्यमाने रत्नागिरीतील चिपळूण तालुक्यातील महिला भात शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञांनाच्या ध्वनी चर्चा सत्राद्वारे घरबसल्या मार्गदर्शन करण्यात आले.
या कार्यक्रमध्ये नितीन माने प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा जिल्हा परिषद रत्नागिरी यांनी शेतकऱ्यांना ऑडिओ कॉन्फरेन्सच्या माध्यमातून आवाहन केले आहे कि “आधुनिक तंत्रज्ञांच्या माध्यमातून रिलायन्स फाउंडेशनच्या सहकार्याने भात शेतीच्या लागवडीचे माहितीचा उपयोग करून करोनाच्या काळामध्ये कोकणातील शेतकऱ्यांनी आधुनिक भात लागवड करून पुणे मुंबई वरून आलेल्या चाकरमान्यांना मानवतेच्या दृष्टिकोनातून मदतीचा हात द्यावा व जास्तीत जास्त भाताचा उत्पादन करावे” . या कार्यक्रमामध्ये भात संशोधन केंद्र शिरगाव रत्नागिरी चे प्रभारी अधिकारी डॉ. भरत वाघमोडे यांनी तज्ञ् मार्गदर्शक म्हणून महिला शेतकऱ्यांना भात लागवडीविषयी मार्गदर्शन केले. यावेळेस डॉ. भरत वाघमोडे यांनी शेतकऱ्यांना भात लागवडीसाठी जमिनीची मशागत कशी करावी, आपल्या प्रभागांनुसार वाणाची निवड कशी करावी , विविध भात वाणाची लागवड कालावधी व त्याची योग्य नियोजन याची माहिती दिली .
तसेच पंचायत समितीचे कृषी विस्तार अधिकारी सुनील गावडे व बी बी पाटील यांनी भात लागवडीच्या विविध शास्त्रीय पद्धती , भात लागवडीनंतरचे नियोजन , खत व्यवस्थापन , रोपवाटिका नियोजन , भात संशोधन केंद्रा मार्फत विकसित केलेल्या विविध भाताच्या वाणाची माहिती महिला शेतकऱ्यांना करून दिली.
करोनाच्या पार्श्वभूमीवर भात लागवड करताना शाररिक अंतर (Physical Distancing ) कसे राखावे, शेतातून काम करताना व करून आल्यावर आपली वयक्तीक स्वछता कशी राखावी याची माहिती उमेद चे तालुका अभियान व्यवस्थापक अमोल काटकर यांनी शेतकऱ्यांना दिली . त्याच प्रमाणे रिलायन्स फाउंडेशनचे कृषी तज्ञ् सचिन मताले यांनी शासनाच्या विविध योजनाची माहिती दिली. कार्यक्रमाचे व्यवस्थापन रिलायन्स फाउंडेशनचे रत्नागिरी जिल्हा व्यवस्थापक श्री राजेश कांबळे,उमेदचे चिपळूण तालुका अभियान व्यवस्थापक अमोल काटकर यांनी केले तसेच कार्यक्रमाची तांत्रीक बाजू रिलायन्स फाउंडेशनचे शुभम लाखकार, तेजस डोंगरीकर यांनी केले व नियोजन गणपत गावडे यांनी केले.
शेतीविषयक ,पशुपलनाविषयी तांत्रिक माहितीसाठी रिलायन्स फाउंडेशनच्या टोल फ्री हेल्पलाइन क्रमांक १८००४१९८८०० क्रमांकावर सकाळी ९.३० ते संध्याकाळी ७,३० वाजेपर्यंत ( रविवार सोडून) संपर्क साधण्याचे आव्हान रिलायन्स फाउंडेशन कडून करण्यात आले आहे . कार्यक्रमाला उमेदीचे जिल्हा अभियान व्यवस्थापक श्री.विक्रम सरगर यांचे व सर्व तालुका व्यवस्थापक , सर्व प्रभाग समनव्यक, गाव स्तरावरील कृषी सखी व CRP यांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला.