रत्नागिरी, (आरकेजी) : दापोलीच्या केशळी समुद्रात मच्छिमार करण्यासाठी जाणारी बोट उलटून झालेल्या दुर्घटनेत एका खलाशाचा मृत्यू झाला. सलाम श्रीवर्धनकर असे मृत खलाशाचे नाव आहे. आज पहाटे ही घटना घडली. तीन खलाशांना वाचवण्यात स्थानिक मच्छिमारांना यश आले. पहाटे ही बोट मच्छिमारी करण्यासाठी खोल समुद्रात निघाली होती. मात्र, समुद्र खवळलेला असल्याने एका उंच लाटेमुळे बोट उलटली झाली. बोटीवरील एकूण आठ खलाशी समुद्रात पडले. चार खलाशी पोहत किना-यावर आले तर उर्वरीत तीन खलाशांना स्थानिक मच्छिमारांनी वाचवले.