
कृषी समिती तोडफोड प्रकरण
रत्नागिरी (विशेष प्रतिनिधी): कृषि उत्पन्न बाजार समितीच्या नाक्यांची तोडफोड करून जाळपोळ केल्याप्रकरणी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या तालुका अध्यक्षांसह ९ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहर पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे.
महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या कार्यकर्त्यांनी शनिवारी कृषि उत्पन्न बाजार समितीच्या तपासणी नाक्यांची तोडफोड केली होती. या प्रकरणी बाजार समितीचे सचिव किरण महाजन यांनी शहर पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीवरून पोलिसांनी महाराष्ट्र स्वाभिमानच्या पक्षाचे तालुकाध्यक्ष सचिन आचरेकर, अशोक वाडेकर, संकेत चवंडे, मेहताब साखरकर यांच्यासह अन्य पाच संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास शहर पोलीस करत आहेत.