रत्नागिरी (आरकेजी) ः तालुक्यातील कोतवडे ग्रुप ग्रामपंचायतीतर्फे सेंद्रीय खत व शेती प्रशिक्षण कार्यशाळा नुकतीच झाला. 15 दिवसांच्या प्रशिक्षण कार्यशाळेत ग्रामस्थांनी उत्स्फूर्तपणे भाग घेतला. नंदकुमार जोशी यांच्या सभागृहात याचे आयोजन केले होते.सेंद्रिय खत आणि शेतीचे प्रशिक्षण कृषितज्ज्ञ संदीप कांबळे व आयसीआयसीआय फाउंडेशन प्रोजेक्ट को-ऑर्डिनेटर अनिल कुमार राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली झाले. सांगता समारंभासाठी कोतवडे ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंच सुरभी शितप, उपसरपंच स्वप्नील मयकेर, ग्रामपंचायत सदस्य प्रज्ञा मोडक, आयसीआयसीआय बँक मॅनेजर प्रज्ञा पाटील, आयसीआयसीआय रिजनल सर्व्हिस मॅनेजर राजरत्ने, शेतकरी सागर सनगरे, प्रशांत पांचाळ, शिला वैद्य, वर्षा जोगळेकर, मनाली सनगरे, माजी सरपंच अनिल बारगोडे उपस्थित होते.















