
रत्नागिरी, (आरकेजी) : राज्य सरकारविरोधात शेतकर्यांचे आंदोलन तापलेले असताना कोकणात कर्जाला कंटाळून एका शेतकऱ्याने आत्महत्या केली आहे. मंडणगड तालुक्यातल्या वेरळतर्फे नातूनगर या गावात बुद्धदास लक्ष्मण साळवी या ५८ वर्षिय शेतकर्याला बॅंकेचे कर्ज फेडता आले नाही. त्यामुळे राहत्या घराच्या छपराला गळफास लावून त्याने जीवन संपविले. बुद्धदास यांचा मुलगा भिमराज याने मंडणगड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
भिमराजच्या फिर्यादिनुसार बुद्धदास यांनी बॅंकेचे कर्ज काढले होते. कर्जाचे हप्ते फेडता येत नसल्याने होणार्या अस्वस्थतेतून त्यांनी मध्यरात्री दोन ते पहाटे सहाच्या दरम्यान आत्महत्या केली. तालुक्यातील एका बॅंकेकडून बुद्धदासने एक लाखांचे पिक कर्ज घेतले होते. कर्जाचे हप्ते त्यांना भरता येत नव्हते. बँकेने तगादा लावला होता. तसेच बॅंकेची नोटीसही मिळाली होती. फोनही येत होते.
कोकणात शेतकरी आत्महत्या घडल्याने एकच खळबळ उडाली आहे.