
रत्नागिरी : ऐन लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर अडिज हजार मराठी कामगारांच्या रोजगाराशी संबंधित असलेले “खंबाटा एव्हिएशन’ प्रकरण खासदार विनायक राऊत यांना भाेवणार अशी चिन्ह आहेत. कारण “खंबाटा एव्हिएशन’ बंद झाल्यानंतर देशोधडीला लागलेले कोकणातील जवळपास 70 टक्के कामगार आता खासदार विनायक राऊत यांच्या विरोधात उभे ठाकलेत. हे कामगार कोकणात विनायक राऊत यांच्या विरोधात घरोघरी जाऊन प्रचार करणार आहेत. आज रत्नागिरीत महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या माध्यमातून झालेल्या पत्रकार परिषदेत कामगारांनी आपली ही भूमिका स्पष्ट केली. या पत्रकार परिषदेला सुनिल तळेकर, विश्वनाथ दळवी आदी कामागारांसह माजी खासदार निलेश राणे देखील उपस्थित होते. आपण या कामगारांच्या पाठीशी असल्याचं राणे यांनी यावेळी स्पष्ट केलं. दरम्यान ज्याने खंबाटा एव्हिएशनमधील मराठी कामगारांना उघडयावर पाडलं, अनेकांचे संसार उध्वस्त झाले, ज्याने मराठी माणसालाच उध्वस्त केलं, तो मराठी माणसाला काय रोजगार देणार असा सवाल करत आशा माणसाला मतं मागण्याचा अधिकारच सांगत आपली खदखद व्यक्त केली.
रत्नागिरी सिंधुदूर्ग लोकसभा मतदार संघातील निवडणुक पुन्हा एकदा रंगतदार अवस्थेत पोहचलीय. खासदार विनायक राऊत यांच्या विरोधात खंबाटा एव्हीगेशन कंपनीतील कामगारांनी आता ब्रम्हास्त्र उगारलं आहे.
‘मराठी माणसांच्या न्याय हक्कासाठी फक्त शिवसेना’ असं गळा काढणारी शिवसेना पुन्हा एकदा याच मुद्यावरून वादात सापडली आहे. आणि हा वाद निवडणुकीत सेनेला भोवणार अशी चिन्हं आहेत. याला कारण ठरतंय ते बंद पडलेली खंबाटा एव्हीएशन कंपनी. मुंबईतल्या आंतराष्ट्रीय विमानतळावर ग्राऊंड हॅडलिंगचे काम करणाऱ्या या कंपनीत २७६३ कामगार होते. यातील जवळपास ७० टक्के कामगार हे मराठी आणि विशेषतः कोकणातील आहेत. खंबाटा एव्हिएशन मध्ये भारतीय कामगार सेना हि मान्यतापात्र युनियन होती. त्या युनिटची जबावदारी खासादार विनायक राऊत यांच्यावर होती. दोन वर्षापुर्वी हि कंपनी बंद पडली. यातील कामगारांना वर्ष वर्ष पगार मिळाले नाहीत. आता या कंपनीतील कामगार देशोधडीला लागलेत. हि कंपनी बंद पडण्यामागे खासदार विनायक राऊते हेच जवाबदार असल्याचा आरोप थेट रत्नागिरीत पत्रकार परिषद घेत या खंबाटा एव्हिएशन कंपनीतील कामगारांनी केला.
या कंपनीतील कामगार सेनेच्या युनियमधील युुनिटची जवाबदारी खासदार विनायक राऊत यांच्याकडे होती. त्यामुळे कंपनी अचानक बंद झाल्यानंतर खासदार विनायक राऊत यांनी आपली जवाबदारी वेळोवेळी झटकली. तसेच शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सुद्धा आपली आश्वासने पाळली नाहीत. त्यामुळे आज कामगारांवर आत्महत्या करण्याची वेळ आलीय. जो मराठी माणसाला न्याय देवू शकला नाही. त्याच्यामुळे मराठी माणसांचे संसार उद्धस्थ झाले तो मराठी माणसाला रोजगार काय देणार असा सवाल खंबाटी एव्हिएशनमधील कामगारांनी उपस्थित केलाय. म्हणुन रत्नागिरी सिंधुदूर्ग लोकसभा मतदार संघात खासदार विनायक राऊत यांच्याविरोधात जावून आता प्रचार करणार असल्याचे कामगारांनी यावेळी सांगितले..
दरम्यान खंबाटा प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी केलेल्या वक्तव्याचा पुरावा दाखवत निलेश राणे यांनी खंबाटा एव्हिएशन कंपनी बंद होण्यामागे मोठा भष्ट्राचार असल्याचा देखील यावेळी आरोप केला.
दरम्यान या सर्व प्रकरणामुळे कोकणातलं राजकीय वातावरण तापणार एवढं मात्र नक्की.














