रत्नागिरी, प्रतिनिधी : कोकणात नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहान साजरा केला जातो. रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील केळवली गावात देखील अशाच प्रकारे नवरात्रोत्सवाचा उत्साह पहायला मिळत आहे. इथल्या श्री आई नवलादेवी मंदिरात हा उत्सव सध्या सुरु आहे. नवरात्रोत्सवाबरोबर चालत आलेली परंपरा गेल्या 500 वर्षापासून आजतागायत केळवली गावात जपली जात आहे. या देवीच्या दर्शनासाठी दुरवरुन भाविक येत असतात.
रत्नागिरी जिल्ह्याचं शेवटचं टोक असलेला तालुका म्हणजे राजापूर. या तालुक्याला पारंपारीक उत्सवाची परंपरा आहे ती अगदी शेकडो वर्षापासून. सध्या नवत्रोत्सव सुरु आहे आणि कोकणातील प्रत्येक गावातील ग्रामदैवतेच्या मंदिरात उत्सव पहायला मिळतो. त्याप्रमाणे राजापूर तालुक्यातील केळवली गावात देखील नवरात्रोत्वाचे रंग बहरलेयत. श्री आई नवलादेवी हे या गावचं ग्रामदैवत. 12 वाड्यांच हे मुळ देवस्थान. मंदिराला जवळपास 500 वर्षापासूनचा इतिहास आहे. अगदी प्राचीन काळापासून पुर्वापार चालत आलेल्या उत्सवाची परंपरा जपण्याचा प्रयत्न इथले ग्रामस्थ करतायत. निसर्गाच्या कुशीच हे प्राचीन मंदिर वसलेलं आहे.अगदी कौलारु.. त्यामुळे इथे आल्यानंतर मनाला वेगळंच समाधान मिळतं. वर्षभरात अनेक उत्सव या मंदिरात साजरे केले जातात..तेही कोणतेही वाद न करता..हे या गावाचं खास वैशिष्टच म्हणाव लागेल.
काय आहे परंपरा ?
नवरात्रोत्सव सुरु झाला कि या नवलादेवीच्या मंदिरात घट बसवले जातात.त्याचबरोबर देवीसमोर विविध प्रकारचे धान्य पेरलं जातं. आणि या धान्यावर पंचामृताचा शिडकावा केला जातो..दस-याच्या दिवशी म्हणजे शेवटी हे उगवलेलं धान्य देवीच्या चरणाशी ठेवलं जातं आणि नंतर मग भाविकांमध्ये हे उगवलेलं धान्य वाटलं जातं..पुर्वापार चालत आलेलीही अनोखी परंपरा देखील आजतागायत या गावात जपली जातेय..या ऊत्सवासाठी दुरवर गेलेला चाकरमानी आवर्जून इथं आपली हजेरी लावतो.
कोकणातील परंपरा टिकून आहे ती इथल्या ग्रामीण संस्कृतीवर…..संस्कृतीचा पगडा असलेल्या या कोकणात तीतक्याच उत्साहात इथ सण देखील साजरे केले जातात..त्यामुळेच तर केळवळी सारख्या गावातून आज देखील शकडो वर्षापासूनची परंपरा जपली जातेय..एका पिढीकडून दुस-या पिढीकडे हा वसा दिला जातोय ते पारंपारीकतेचा साज चढवूनच..त्यामुळेच कोकणातील परंपरा आजतागायत टिकून आहे.