मुंबई : दिनांक 17 जुलै २०२२ रोजी ब्रह्मकुमारी संस्था व सैनिक फेडरेशन मुंबई जिल्हा द्वारे “कारगिल विजय दिवस” निमित्त हुतात्मा सैनिकांना मेणबत्ती प्रज्वलित करून मालाड येथे आदरांजली वाहण्यात आली. या कार्यक्रमास ब्रह्मकुमारी संस्थेचे कुंती दीदी, शोभा दीदी तसेच नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे माननीय सुधीर सावंत साहेब(निवृत्त ब्रिगेडियर) माजी खासदार, आमदार आमंत्रित होते. सावंत यांनी या कार्यक्रमांमध्ये सैनिकांच्या शौर्य कथा तसेच सैनिक जीवनातील खडतर अनुभव कथित केले. ब्रह्मा कुमारी कुंती दीदी आणि शोभा दीदी याने सैनिकांना राजयोग मेडिटेशन विषयी मार्गदर्शन केले.
काम, क्रोध मोह माया या विकारांपासून दूर राहून पवित्रा आत्मा द्वारे मनशांती कशी प्राप्त होईल याबाबत उपदेश केला. एक दुसऱ्या प्रती सदभावना ठेवावी.आपले चांगले विचार वातावरणात मांडावे. यामुळे जगामध्ये शांतता लाभेल. नमारात्मक विचार दुसऱ्या प्रती करू नये, असे त्या म्हणाल्या. या कार्यक्रमाला सुभाष दरेकर सैनिक फेडरेशन उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य, डी एफ. निंबाळकर जनरल सेक्रेटरी व प्रवक्ता सैनिक फेडरेशन महाराष्ट्र राज्य, अरविंद गव्हाणकर कोर कमिटी सदस्य, माजी सैनिक श्रीधर टक्केकर, सुरक्षा घोसाळकर तसेच भारतीय माजी सैनिक संघटना मुंबई पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे आयोजन शत्रुघ्न महामुनकर सचिव सैनिक फेडरेशन मुंबई जिल्हा व ज्ञानधारा मेडिटेशन सेंटर मालाड. यांनी केले. सैनिक फेडरेशनच्या वतीने ब्रह्मकुमारी संस्थेला कारगिल विजय दिवस सैनिक फेडरेशन सन्मान चिन्ह प्रदान करून सन्मानित केले गेले.