स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव १५ ऑगस्ट २०२२ या दिनानिमित्त उपक्रम
मुंबई उपनगर (शांताराम गुडेकर ) : “प्रत्येक कृती ही राष्ट्रहिताची विश्वशांतीची.”योगीयांचे शिरोमणी संत तुकाराम महाराज सांगतात… “वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे”आधुनिक संत जीवनविद्येचे शिल्पकार सद्गुरु श्री वामनराव पै सांगतात…”पर्यावरण हाच खरा नारायण”
या पर्यावरणाची जोपासना करण्याकरता जीवन विद्यामिशन व निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमानाने स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून आज १५ ऑगस्ट रोजी सद्गुरू श्री वामनराव पै उद्यान, टागोर नगर, विक्रोळी येथे वृक्षारोपण कार्यक्रम अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमांमध्ये ७५ वा अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिन साजरा करताना प्रभात फेरी काढण्यात आली, अनेक प्रकारची (चाफा, वड, लिब, तुळस, बदाम, कडुलिंब, पेरू) झाडे लावण्यात आली व झाडे लावा झाडे जगवा हा संदेश देण्यात आला.या प्रसंगी जीवनविद्या मिशन चे पदाधिकारी ,कार्यकर्ते तसेच निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाचे मुंबई जिल्हा अध्यक्ष कमलाकर मोरे, जिल्हाध्यक्षा सौ.विजया वाघमारे, उपाध्यक्षा सौ. प्रज्ञा कदम उपस्थित होते.