अमरावती – मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या पॉलिटब्युरो सदस्य आणि माजी राज्यसभा खासदार कॉम्रेड वृंदा करात यांची सर्वसाधारण सभा संपन्न झाली. शनिवार, १ ऑक्टोबर २०२२ रोजी आदिवासीबहुल धारणी तालुक्यातील भारताचा कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) अमरावती जिल्हा समितीच्या वतीने कॉ. वृंदा करात यांची सर्वसाधारण सभा लाईफ फंक्शन हॉल; सीताराम नगरी होळी चौकात पार पडली.
सुरवातीला प्रथम कॉ. वृंदा करात यांचे विविध संघटनांनी स्वागत केले. बैठक कॉ.उदयन शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली झाली; महादेव गारपवार यांनी संचालन तर अध्यक्षीय भाषण उदयन शर्मा अध्यक्षीय भाषण करतांना उदयन शर्मा यांनी म्हटले की या आदिवासी भागात पक्षाने केलेल्या कामाची माहिती देत आगामी काळात पक्ष संघटना मजबूत करून वनजमिनीसाठी आदिवासींची चळवळ वाढविण्याचे आवाहन केले.
सभेच्या प्रमुख वक्त्या वृंदा करात यांनी सर्वप्रथम या मेळघाट धारणी परिसरातील निसर्गसौंदर्य आणि पर्यावरणाचे कौतुक केले, जिथे हे सर्व सौंदर्य आणि पर्यावरण शतकानुशतके आदिवासी बांधवांनी वाढवले आहे आणि संरक्षित केले आहे. कुपोषणामुळे इथे मोठ्या प्रमाणात मृत्यू होत आहेत, आरोग्य सेवा उपलब्ध नाही, शिक्षणाची स्थिती चांगली नाही, तर दुसरीकडे व्याघ्र प्रकल्पाच्या नावाखाली आदिवासींना गावातून विस्थापित केले जात आहे. वर्षानुवर्षे ताब्यात असलेल्या आदिवासी बांधवांना वनजमिनीतून बेदखल केले जात आहे. आज आदिवासींचे संविधानिक आणि कायदेशीर हक्क नष्ट करून भाजप RSS चे मोदी सरकार त्यांना त्यांच्या संस्कृतीपासून दूर करत आहे. आमचा लढा या सरकारशी आहे. दुसरीकडे २००६ च्या वनहक्क कायद्यात दिलेले अधिकार हिरावून घेतले जात आहेत. आजच्या सभेत ४९ गावांतील लोकांचा सहभाग होता. वृंदा करात यांनी आदिवासींच्या समस्या जाणून घेतल्या त्यांच्या समस्येवर चर्चा सुद्धा केली.
यावेळी मंचावर उपस्थित किसान सभा माजी राज्य अध्यक्ष कॉम्रेड दादा रायपुरे, राज्य कमिटी सदस्य कॉम्रेड सुभाष पांडे, जिल्हा सचिव कॉ.रमेश सोनुले, कॉ.देविदास राऊत, कॉ.सुनील देशमुख, कॉ. शाम शिंदे, कॉ. राजेंद्र भांबोरे, कॉ. अंकुश वाघ, कॉ. अनिल गायकवाड, कॉ. जितेंद्र चोपडे, कॉ. भारत वरठे,कॉ. दिलीप शापामोहन, कॉ. पद्माताई गजभिये या सह जनवादी महिला संघटना, एस एफ आय,डी वाय एफ आय, सीटू, किसान सभा,शेतमजूर युनियन पदाधिकारी व मोठ्या संख्येत जनसमुदाय उपस्थित होते.