
रत्नागिरी : गणेशोत्सवासाठी कोकणात लाखोंच्या संख्येने चाकरमानी कोकणात येत असतात. मात्र रेल्वे तसेच एसटी बसेस या कालावधीत नेहमीच फुल्ल असतात. त्यामुळे अनेक चाकरमानी मिळेल त्या वाहनाने आपल्या गावची वाट धरतात. दरम्यान गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांनाची गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वे तसेच पश्चिम रेल्वेने कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या त्यांच्या गाड्यांना जादा डबे जोडण्याचा निर्णय घेतला आहे. एकूण 11 गाडयांंना जादा डबे जोडण्यात येणार आहेत. मध्य रेल्वेने 8 तर पश्चिम रेल्वेने 3 गाड्यांना जादा डबे जोडण्याचा निर्णय घेतला असल्याची कोकण रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक उपेंद्र शेंड्ये यांनी दिली आहे. दरम्यान 01033/34 छ.शि.म.ट – रत्नागिरी – पनवेल ही गाडी 1 ते 15 सप्टेंबर या कालावधीत दररोज रात्री धावणार आहे, व ही गाडी रत्नागिरीकरांसाठी अत्यंत सोईची आहे. त्यामुळे या गाडीचा वापर केल्यास पहाटे सुटणाऱ्या दादर पॅसेंजर वरील भार हलका होईल. त्यामुळे गाडीचा वापर जास्तीत जास्त प्रवाशांनी करावा असं आवाहन कोकण रेल्वेकडून करण्यात आलं आहे.
मध्य रेल्वेने डबे वाढवलेल्या गाड्या
*1001/02 छ.शि.म.ट – सावंतवाडी – छ.शि.म.ट (आठवड्यातून 5 दिवस ) – 20 चे 22 डबे
*01047/48 पनवेल – सावंतवाडी – कुर्ला ट. (साप्ताहिक) – 20 चे 22 डबे
*पश्चिम रेल्वेने डबे वाढवलेल्या गाड्या*
*09011/09012 – बांद्रा मंगलोर बांद्रा (साप्ताहिक) – 18 चे 20 डबे
*09007/09008 – मुंबई सेंट्रल थिविम मुंबई सेंट्रल (आठवड्यातून 2 दिवस ) – 20 चे 24 डबे
*09418/09417 – अहमदाबाद थिविम अहमदाबाद (साप्ताहिक) – 20 चे 24 डबे
















