मुंबई : राज्यातील विविध २७ जिल्ह्यांमधील ७३४ ग्रामपंचायतींच्या सदस्यांसह थेट सरपंचपदासाठी २६ डिसेंबर २०१७ ला मतदान घेण्यात येणार आहे. २७ डिसेंबर २०१७ रोजी मतमोजणी होईल, असे राज्य निवडणूक आयोगानेे जाहीर केले आहे.
जानेवारी व फेब्रुवारी २०१८ मध्ये मुदत संपणाऱ्या आणि नव्याने स्थापित ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आयोगाने हा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यासाठी नामनिर्देशनपत्रे ५ डिसेंबर ते ११ डिसेंबर २०१७ या कालावधीत दाखल करता येतील. नामनिर्देशनपत्रांची छाननी १२ डिसेंबर २०१७ रोजी होईल. नामनिर्देशनपत्रे मागे घेण्याची अंतिम मुदत १४ डिसेंबर २०१७ असेल. त्याच दिवशी निवडणूक चिन्हांचे वाटप होईल. २६ डिसेंबर २०१७ रोजी सकाळी ७:३० ते सायंकाळी ५:३० या वेळेत मतदान होईल. तर गोंदिया व गडचिरोली या दोन जिल्ह्यांमध्ये मतदानाची वेळ केवळ दुपारी ३ पर्यंत असणार आहे. २७ डिसेंबर २०१७ रोजी मत मोजणी होईल, असे निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या प्रसिद्धीपत्रकात नमूद केले आहे.
ग्रामपंचायतींची जिल्हानिहाय संख्या
ठाणे- ३१, पालघर- ३९, रायगड- ११, रत्नागिरी- १०, सिंधुदुर्ग- १६, नाशिक- २, जळगाव- १००, नंदुरबार- १३, अहमदनगर- ६७, पुणे- ९९, सोलापूर- ६४, सातारा- १९, सांगली- ५, कोल्हापूर- १२, औरंगाबाद- २, बीड- १६२, नांदेड- ४, परभणी- २, उस्मानाबाद- १, लातूर- ५, अमरावती- १३, अकोला- ३, वाशीम- २, बुलडाणा- ४३, वर्धा- ३, गोंदिया- २ आणि गडचिरोली- ४