
रत्नागिरी : ध्येय्य नेहमी उत्तुंग ठेवले पाहिजे, त्यादृष्टिने काम करण्याची तयारी पाहिजे, ते गाठण्यासाठी आपण प्रयत्न करणे गरजेच आहे असे प्रतिपादन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी रा.भा. शिर्के हायस्कुल, माळनाका, रत्नागिरी येथे शासकीय तंत्रनिकेतन विद्यालय, रत्नागिरी यांच्यामार्फत आयोजित मेळाव्याच्या उद्घाटन प्रसंगी केले.
यावेळी शासकीय तंत्रनिकेतन, रत्नागिरीचे प्राचार्य गणेश बुरसाडे, शिर्के हायस्कूलच्या मुख्याध्यापिका श्रीमती गुळवणी, शासकीय तंत्रनिकेतन, रत्नागिरीचे माजी विद्यार्थी आणि उद्योजक दिलीप भाटकर, तंत्रशिक्षण मार्गदर्शन मेळाव्याचे संयोजक दिपक शिंदे आदि मान्यवर यावेळी उपस्थित होते.
पतंप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्टार्ट अप इंडिया सारखे उपक्रम हाती घेतला असून यासाठीदेखील आपल्याला कुशल युवकांची गरज भासणार आहे. आपण आपल करिअर निवडत असताना बाजारात आता व पुढे ज्या क्षेत्रामध्ये गरज भासणार आहे त्यात सहभाग घेणे आवश्यक आहे. आपल्या यशस्वी होण्यासाठी काहीतरी वेगळ करण्याची धमक असणे गरजेच आहे. तंत्र शिक्षण घेतल्याने आपल्यात तांत्रिक क्षमता निर्माण होईल. ज्या क्षेत्राची निवड कराल त्यामध्ये आपल्याला नक्कीच चांगल यश मिळेल. तंत्र शिक्षण घेतल्याने आपण एक कुशल पर्यवेक्षक होऊ शकाल. खाजगी व सरकारी नोकरी ची संधी निर्माण होऊ शकेल किंवा आपण स्वत:चा व्यवसाय सुरु करु शकाल, असे ते यावेळी म्हणाले.
रत्नागिरीमध्ये देखील एच एनर्जी, मुंबई गोवा हायवे चौपदरीकरण, चिपळूण कराड महामार्ग, जयगड डिंगणी रेल्वे आदि अशा प्रकारचे मोठया प्रकल्पाचे काम सुरु आहे. यासारख्या ठिकाणी कुशल स्वत:मध्ये तांत्रिक क्षमता असणाऱ्या युवकांची गरज भासत असते.जीवनात कोणतीही गोष्ट करताना त्यामध्ये प्रमाणिकपणा, सातत्य, सत्यता, एकाग्रता, आत्मविश्वास असणे गरजेच आहे तरच आपण करत असलेल्या कोणत्याही क्षेत्रातील काम उत्तम प्रकारे करु शकाल. क्षेत्रात उत्कृष्ठ काम करणाऱ्याची दखल समाजाला घ्यावी लागते. त्यामुळे आपल्या जीवनात आमुलाग्र बदल होईल आणि आपण आपल्या जीवनात यशस्वी व्हाल, असा विश्वास व्यक्त करत जिल्हाधिकाऱ्यांनी मेळाव्यामध्ये उपस्थित विद्यार्थी, विद्यार्थीनींना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या मेळाव्यासाठी 10वी, 12 वी चे विद्यार्थी, विद्यार्थींनी व त्यांचे पालक मोठया संख्येने उपस्थित होते.