रत्नागिरी, (आरकेजी) : सरकार आणि प्रशासन पाणी टंचाईचा प्रश्न सोडवीत नाहीत हे पाहून ग्रामस्थांनीच नदीवर बंधारा बांधाला आणि तो प्रश्न सोडवला. यामुळे दापोली तालुक्यातील शिरशिंगे गावाचा इतर ग्रामंस्थांसमोर आदर्श निर्माण झाला आहे.
या गावात पाण्यासाठी दहा वर्षांपूर्वी बांधलेला बंधारा वर्षभरात वाहून गेला. त्यानंतर गावात भीषण पाणीटंंचाई निर्माण झाली होती. पाणी टंचाई भविष्यात भेडसावू नये, यासाठी गावानेच पुढाकार घेतला. गावातल्या पण मुंबईत राहणाऱ्या संदिप जोशी यांनाही पाणी टंचाईची झळ बसली होती. त्यांना श्रमदानाची कल्पना सूचली आणि ती त्यांनी गावकर्यांसमोर मांडली. गावच्या नदीवर मातीचा बंधारा बांधण्याचे ठरवण्यात आले. गावातल्या व्यक्तींच्या माध्यमातून मातीचा बंधारा घालण्याची संकल्पनेला गावकऱ्यांनी होकार दिला. त्यामुळे सरकारचा एक पैसा न घेता श्रमदानातून भविष्य़ातल्या पाण्यासाठी नियोजन येथे सुरु झाले.
दोन दिवस मेहनत करुन पावसात भिजून १० वर्षांपुर्वी वाहून गेलेल्या बंधाऱ्याला नव्याने कलाटणी ग्रामस्थांनी दिली. सध्या मातीचा १०० फुट लांबीचा आणि सात फुट उंचीचा बंधारा गावकऱ्यांनी श्रमदानातून बांधण्यात आला आहे. हजारो पोती माती प्लँस्टिक पिशव्यात भरत गावातल्या लोकांनी श्रमदान केले. यामुळे गावाचा भविष्यातील पानी टंचाईचा प्रश्न सुटला आहे, असे संदिप जोशी यांनी सांगितले.