
शहरातील पूजा टॉकिजपर्यंत पाणी आहे, तसेच बाजारपूल पाण्याखाली गेला आहे. चिपळूण शहरातील मध्यवर्ती बसस्थानकपर्यंत पाणी शिरले आहे. त्यामुळे बसस्थानकातील सर्व एसटीच्या गाड्या बाहेर काढण्यात आल्या आहेत. चिपळूण शहरातील वडनाका, चिंचनाका, पेठमाप अशा भागात मोठ्या प्रमाणात पाणी घुसले आहे. तर सांस्कृतिक केंद्राच्या परीसरातही पुराचा वेढा पडला आहे. या पुरामुळे चिपळूण शहरातील व्यापाऱ्यांचे, नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
दरम्यान वाशिष्ठीने धोक्याची पातळी ओलांडल्याने मुंबई-गोवा महामार्गावरील बहादूरशेख नाका येथील पूल काल( शनिवार) रात्री वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता, मात्र नदीची धोक्याची पातळी कायम असल्याने सकाळीही हा पूल वाहतुकीसाठी बंद होता. यामुळे वाहतूक गुहागर बायपास रोडकडून वळविण्यात आली आहे.