रत्नागिरी (प्रतिनिधी): चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेने केवळ २७ वर्षाच्या वाटचालीत सर्व जनमानसात एक वेगळी प्रतिमा निर्माण केली आहे . मार्च २०२१ अखेर संस्थेला व्यवसायीक नफा ३५ कोटी झाला असून संस्थेने १४७२ कोटी व्यवसायाचा टप्पा पूर्ण केला आहे, अशी माहिती चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुभाषराव चव्हाण यांनी दिली.
यानुसार संस्थेची मार्च २०२ १ अखेर सभासद संख्या १ लाख २४ हजार ९ ७३ , भाग भांडवल ५८ कोटी ०४ लाख तर एकूण स्वनिधी १०३ कोटी ९ २ लाख आहे . फक्त २७ वर्षाच्या कालखंडात सभासद संख्या व भाग भांडवल व स्वनिधी वाढीमध्ये राज्यातील काही निवडक संस्थामध्ये या संस्थेचा समावेश होतो . संस्थेच्या ठेवी ८०२ कोटी ५८ लाख एकूण कर्जव्यवहार ६६ ९ कोटी ४ ९ लाख त्यापैकी सोनेतारण कर्ज २५२ कोटी ४४ लाख तर एकुण प्लेज लोन २८८ कोटी ०७ लाख संस्थेची बँकेतील एकूण गुंतवणूक २७५ कोटी २ ९ लाख असून मालमत्तेतील गुंतवणूक २ ९ कोटी ८८ लाख आहे . संस्थेचा एकूण व्यवसाय १४७२ कोटीचा असुन तो २०२५ पर्यंत २५०० कोटीचा टप्पा पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे . मागील आर्थिक वर्षात कोरोना संसर्गामुळे सर्वत्र मंदिचे वातावरण राहुनही संस्थेने व्यवसाय वाढ करण्यात व नफा क्षमतेचे सातत्य राखले आहे . कोविडच्या काळात सुध्दा संस्थेने कामकाज अखंडपणे चालु ठेवत ग्राहकांना नियोजनबध्द , नम्र व जलदसेवा दिली आहे . शासनाने ठरवून दिलेल्या आदर्श प्रमाणांचा त्यांचे अंमलबजावणीसाठी नियोजनबध्द प्रयत्न केल्यामुळे महत्वाच्या आदर्श प्रमाणांच्या बाबतीत संस्थेने यशस्वीपणे काम केले आहे . संस्थेचा आर्थिक सक्षमतेचा पाया भक्कम आहे . संस्थेने आपल्या आर्थिक सक्षमते बरोबरच सामाजीक बांधीलकी जपण्यात यशस्वी झाली आहे . सभासदांच्या हिताला प्राधान्य देत असतानाच ठेवीदारांनाही त्यांच्या गुंतवणूकीवर जास्तीत जास्त मोबदला दिला जातो .
गेली २२ वर्षे संस्था आपल्या सभासदांना १५ टक्के डिव्हीडंट देत आहे . या वर्षीही ही परंपरा कायम ठेवण्यात संस्था यशस्वी झाली आहे . संस्थेच्या आर्थिक सक्षमते बरोबरच संस्थेच्या सभासदांच्या हितासाठी प्रतिवर्षी वेगवेगळे उपक्रम राबविले जातात . सभासदांच्या मुलांना रोजगार व स्वयंरोजगार देण्यासाठी त्यांच्या व्यवसाय वृध्दीसाठी सुलभ पद्दतीने अर्थ पुरवठा करण्या बरोबरच त्यांना मार्गदर्शन करणेसाठी सातत्याने वेगवेगळया क्षेत्रातील तज्ञांची माहितीपर मार्गदर्शनपर व्याख्याने ठेवण्यात येत असतात . या संस्थेच्या कार्यक्षेत्रातील शेतकरी सभासदांना शेती पुरक जोडधंदा उपलब्ध कावा यासाठी संस्थेने पुढील ५ वर्षात किमान ५००० शेतक – यांना शेतीपुरक दुग्ध व्यवसायाची जोड देऊन त्यांना स्वावलंबी करण्याचा उपक्रम कार्यान्वीत केला असून त्याला संस्थेच्या संपूर्ण कार्यक्षेत्रात फार मोठया प्रमाणावर प्रतिसाद मिळत आहे . त्या शिवाय वेगवेळया स्वयंरोजगाराच्या माध्यतातून पुढील ५ वर्षात २५००० बेरोजगारांना स्वयंरोजगाराच्या माध्यमातून रोजगार देण्यासाठी काम चालू आहे . त्याचबरोबर आता आलेल्या कोरोनाच्या देश व्यापी संकटातही संस्थेने शाखा संलग्न सर्व सभासदांना त्यांच्या आर्थिक संकटात सर्वतोपरी आर्थिक आधार देण्यासंबंधी प्रभावीपणे उपाययोजना कार्यान्वीत केलेली आहे . त्यासाठी स्थानिक स्वराज्यसंस्था , संस्थेचे समन्वयक , स्थानिक कार्यकर्ते यांची मदत घेण्यात येत आहे . समाजातील अल्प उत्पन्न , मध्यम उत्पन्न गटातील घटकांसाठी त्यांची भविष्यातील स्वजे साकारता येतील अशा काही ठेव योजना कार्यान्वीत केल्या असून लहान मुलावर बचतीचे संस्कार घडविणारी ” धनलक्ष्मी ठेव ” योजना कार्यान्वीत केली असून आता पर्यंत ४०००० हून अधिक लहान मुलांच्या पालकांनी त्यांची बचतीची खाती सुरू केली असुन ही ठेव योजना लहान मुलांवर बचतीचे संस्कार घडविणारी ठेव योजना म्हणून जनतेमध्ये लोकप्रिय झाली आहे . दरमहा सरासरी २५ लाखाहुन अधिक रक्कम या खात्यात जमा होत असते . त्याशिवाय अल्प व मध्यम उत्पन्न गटातील सभासदाना त्यांच्या भविष्यातील स्वप्ने साकारण्यासाठी २ वर्षापासून १० वर्षापर्यंतच्या कालावधीच्या एकूण आठ ( ८ ) आवर्तक ठेव योजना कार्यान्वीत करण्यात आल्या असून या योजनेचे ५०००० हून अधिक ठेव खातेदार असून संस्थेकडे दरमहा साधारण ४ कोटी २५ लाखाहुन अधिक रक्कम त्यांच्या आवर्तक ठेव खात्यात जमा करीत असतात . या ठेव योजनेच्या माध्यमातून संस्थेने सर्व आर्थिक घटकांवर बचतीचे संस्कार घडविण्याचे काम केले आहे . सहकाराच्या मुळ उद्देशा प्रमाणे समाजातील आर्थिक दुर्बल व वंचीत घटकांसाठी आर्थिक आधार देणेसाठी व त्यांना बचतीची सवय लागावी यासाठी ” सहकार समृध्दी ” हा आराखडा करण्यात आला असुन तो यशस्वी राबवण्यासाठी संस्थेच्या सर्व हितचिंतकांचा , सभासदांचा आणि सहकाराबद्दल आत्मीयता असणा – या असंख्य कार्यकार्त्यांचा मोलाचा सहभाग लाभेल . आपले नियोजीत उद्दिष्ट पुर्ण करण्याची परंपरा आपण याहि बाबतीत सिध्द करू . ” आपली माणसे – आपली संस्था ” हे ब्रीद वाक्य स – या अर्थाने सिध्द करण्यात सहकार्य करणारे ठेवीदार , ग्राहक , संचालक , समन्वयक व कर्मचारी वर्ग यांचे मोलाचा वाटा आहे . या सर्वांचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री.सुभाषराव चव्हाण साहेब यांनी धन्यवाद दिले आहेत