मुंबई/नागपूर : बळीराजाच्या समर्थनार्थ पुकारण्यात आलेला ‘महाराष्ट्र बंद’ पुर्णत: यशस्वी झाला. महाराष्ट्रातील जनतेने शेतकऱ्यांसाठी स्वयंस्फुर्तीने बंद पाळत उत्तर प्रदेशात घडलेल्या लखीमपुर खीरी येथील घटनेचा निषेध नोंदवला, असे समाधान पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीप कवाडे यांनी सोमवारी व्यक्त केले.
जयदीप कवाडे यांच्या नेतृत्वात राज्यातील अनेक शहरांमध्ये पीरिपाच्या कार्यकर्त्यांनी लखीमपूर खीरी येथील हिंसाचारासह देशव्यापी खासगीकरणाच्या विरोधात घोषणाबाजी करीत केंद्र सरकारच्या धोरणांचा निषेध नोंदवत महाराष्ट्र बंद यशस्वी केला. राज्यातील प्रत्येक तालुका आणि जिल्हास्तरावर आंदोलन करण्यात आले. नागपूरातील मुंजे चौकात पीरिपातर्फे करण्यात आलेल्या आंदोलनात शेकडो कार्यकत्र्यांनी केंद्र आणि योगी सरकारच्या हिटलरशाही वृत्तीचा निषेध नोंदवला.
बळीराजा हा जगाचा पोशिंदा आहे. अस्मानी आणि सुल्तानी संकटांचा सामना करीत मायबाप शेतकरी अन्नधान्य पिकवत सर्वांना जगवतो. पंरतु, उत्तर प्रदेशातील लखीमपुर येथील घटनेत राजकीय सुडबुद्धीने शेतकर्यांना गाडीखाली चिरडून त्यांची हत्या करण्यात आली. हे पुर्वनियोजित षडयंत्र होते, असा आरोप जयदीप कवाडे यांनी यानिमित्ताने केला.
राष्ट्रपतींना निवेदन पाठविणार
शेतकरी विरोधी केंद्र आणि योगी सरकारचा निषेध नोंदवण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने पुकारलेल्या महाराष्ट्र बंद ला पीरिपाने समर्थन देत बंदमध्ये सहभागी झाली होती. शेतकर्यांच्या न्याय हक्कासाठी पुकारण्यात आलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेस,कॉंग्रेस आणि शिवसेनेच्या बंदला पीरिपाने पाठिंबा देत तालुका,जिल्हास्तरावर आंदोलन करण्यात आल्याचे जयदीप कवाडे म्हणाले. बळीराजावर होणाऱ्या अन्यायाला तीव्र विरोध कायम राहणार यासाठी पार्टीकडून लवकरच राष्ट्रपतींना निवेदन पाठविणार असल्याचेही ते म्हणााले.
आंदोलनात नागपूर अध्यक्ष अरुण गजभिये, कैलास बोंबले, बाळूमामा कोसमकर, अजय चव्हाण, विपीन गडगिलवार, कुंदन उके, सुरेश बोनदाडे, सी. जि. रामटेके, सिद्धार्थ सोमकुवर, प्रकाश मेश्राम, अजय वासनिक, मोरेश्वर दुपारे, रमेश गेडाम, अंकित डोंगरे, सुरेश गवळी, कपिल लिंगायत, पियुष हलमारे, कुशीनारा सोमकुवर तसेच पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे विदर्भ व जिल्हयातील कार्यकर्ते यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.