
याबाबत बोलताना उदय सामंत म्हणाले की, अंतिम वर्षांच्या परीक्षेबाबतचा विषय सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे. ही केस सर्वोच्च न्यायालयात सुरू असल्याने मी त्याच्यावर भाष्य करणं योग्य नाही. पण जी भूमिका मी यापूर्वी मांडली आहे, तीच भूमिका मी अँँफिडेव्हीडच्या माध्यमातून सर्वोच्च न्यायालयात मांडली आहे. अंतिम वर्षांच्या परीक्षा घेणं, हे या कालावधीत महाराष्ट्र शासनाला शक्य नाही, अशा पद्धतीचंच अँँफिडेव्हीड केलं आहे. पण आम्ही परीक्षाच घेणार नाही अशा पद्धतीचा अपप्रचार विरोधक करत आहेत. पण आम्ही कुठेही म्हटलं नाही, की आम्ही परिक्षाच घेणार नाही, कोव्हिड गेल्यानंतर ज्यांना मार्क्समध्ये इम्पृव्ह करायचं आहे, ज्यांना ग्रेडमध्ये इम्पृव्ह करायची आहे ते परीक्षा देऊ शकतात, आणि त्यांच्यासाठी विद्यापीठ परीक्षा घेतील असं आम्ही यापूर्वीच जाहीर केलं आहे. पण सध्या ही केस सर्वोच्च न्यायालयात सुरू असल्याने आज या विभागाचा प्रमुख म्हणून याबाबत काही वक्तव्ये मी करणं उचित ठरणार नाही, असं सामंत यांनी यावेळी स्पष्ट केलं..