
यावेळी हळबे म्हणाले की, दुसऱ्याचं नुकसान करून केलेल्या विकास हा विकास होत नाही. ज्यावेळी सर्व पृथ्वी बेचिराख होईल तेव्हा अश्रू ढाळण्यासाठी फक्त स्त्री उरेल स्त्रियांचा सन्मान फक्त कार्यक्रमा पुरता मर्यादित न राहता आपल्या आयुष्यातच स्त्रियांचा सन्मान असावा माझ्या भारतात स्त्री दैवत असू शकते. भारतातल्या भाषाना ही मातेचा दर्जा दिला आहे. समाजातील सर्व लोक माझे आहेत, हे विचार रूढ झाले पाहिजेत त्यानंतरच आपल्या देशात समानता सर्व धर्म समभाव आहे असे म्हणता येईल. विकास कामामुळे स्त्रीभुन हत्या वाढत आहेत. इंदिराबाई हळबे मावशींनी मुलींना जन्माला येण्याची संधी दिली. ही संधी पुन्हा मिळावी हीच प्रेरणा देणारे हे पुस्तक आहे, असेही याप्रसंगी पद्मश्री डॉक्टर गणेश देवी यांनी सांगितले
पुस्तक प्रकाशनाच्या वेळी आपले मनोगत व्यक्त करताना मातृ मंदिर संस्थेचे कार्याध्यक्ष व या पुस्तकाचे लेखक अभिजीत हेगशेट्ये यांनी सांगितलं की, मी मातृ मंदिर संस्थेचा सेवक आहे. जेव्हा मातृमंदिर मध्ये कामाला सुरुवात केली, तेव्हा मावशी बद्दल कोणालाच काही माहीत नव्हते. त्या काळात मावशी कशा काम करत असाव्यात याचा विचार करता करता मी मावशींना शोधण्याचा प्रयत्न सुरू केला. त्या काळात रूढी परंपरा अंधश्रद्धा मोठ्या प्रमाणात होत्या. त्यावेळी त्यांनी ही संस्था स्थापन केली हॉस्पिटल सुरू करण्याचा उद्देश पैसा कमावणे हा नव्हता. मावशींच्या प्रत्येक गोष्टीत वैचारिक उत्क्रांतीचा वाद होता. परिवर्तनाचा हा उत्क्रांतीचा वाद मावशींच्या कार्याच्या प्रत्येक टप्प्यात दिसतो. मावशींनी मोठ्या प्रमाणात पाळणाघरे बालवाड्या बचत गट सुरू केली, खऱ्या अर्थाने पोषण आहाराची खरी सुरुवात मावशींनीच केली. त्यासाठी च मावशी माझ्यासाठी आदर्शवत आहे असे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रसेवा दलाचे पद्मश्री डॉक्टर गणेश देवी, ग्रंथालीचे संस्थापक दिनकर गांगल, माजी राज्यमंत्री रवींद्र माने माजी आमदार सुभाष बने, राष्ट्र सेवा दलाचे प्रकाशन चे संदेश भंडारे, मातृमंदिरचे कार्यवाह आत्माराम मिस्त्री, राष्ट्र सेवा दलाचे जिल्हा संघटक युयुत्सु आर्ते व इतर मान्यवर उपस्थित होते.