
गेले काही दिवस जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू आहे. समाधानकारक पावसामुळे शेतीच्या कामांनाही वेग आलेला आहे. तसेच धरण क्षेत्रातही पाऊस चांगलाच बरसत असल्याने काही धरणं 100 टक्के भरली आहेत. यामध्ये मंडणगड तालुक्यातील 2, दापोलीतील 5, खेड मधील 4, चिपळूणमधील 7, गुहागरमधील 1, संगमेश्वरमधील 5, रत्नागिरीतील 1, लांजा तालुक्यातील 5, राजापूरमधील 4 अशी जिल्ह्यातील 34 धरणं 100 टक्के भरली आहेत.
कोणती धरणं 100 टक्के भरली
मंडणगड – पणदेरी, भोळवली
दापोली – शिरसाडी, सोंडेघर, सुकोंडी, आवाशी, पंचनदी
खेड – शिरवली, शेलडी, पिंपळवाडी, तळवट
गुहागर – गुहागर
चिपळूण – फणसवाडी, मालघर, कळंवडे, अडरे, खोपड, मोरवणे, आंबतखोल
संगमेश्वर – तेलेवाडी, कडवई, गडनदी, गडगडी, रांगव
रत्नागिरी – शिळ
लांजा – व्हेळ, गवाणे, मुचकुंदी, बेणी, इंदवटी
राजापूर – अर्जुना, ओझर, गोपाळवाडी, वाटूळ