
महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकाल शुक्रवारी जाहीर झाला. कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर यंदा दहावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर मूल्यांकन गुण पद्धतीने हा निकाल जाहीर करण्यात आला..
कोकण विभागातून एकूण 31 हजार 168 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. या सर्व विद्यार्थ्यांचे अंतर्गत मूल्यमापन करण्यात आले. यात सर्वच्या सर्व विद्यार्थी उत्तीर्ण होऊन निकाल 100 टक्के लागला. यामध्ये रत्नागिरीतील 10 हजार 754 मुले आणि 10 हजार 323 मुली असे एकूण 21 हजार 80 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. सिंधुदुर्ग जिल्ह्यात 5 हजार 284 मुले तर 4 हजार 804 मुली असे एकूण 10 हजार 88 विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
यंदाचा निकाल माध्यमिक शाळा स्तरावर विविध मूल्यांकन प्रक्रियेद्वारे तयार करण्यात आलेला असल्याने तसेच अंतर्गत मूल्यमापनासाटी ग्राह्य धरलेल्या प्रथम सत्र, सराव परीक्षा, अन्य मूल्यमापन इ. परीक्षांच्या उत्तरपत्रिका विद्यार्थ्यांना दाखवण्यात आल्याने गुणपडताळणी, उत्तरपत्रिकांच्या छायांकित प्रती मिळणे, मुनर्मूल्यांकन या सुविधा या परीक्षेसाठी कोणत्याही स्तरावर उपलब्ध नसणार आहेत. श्रेणीसुधार योजनेंतर्गत नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांचा निकाल तयार करण्यात आलेला नाही. या विद्यार्थ्यांसाठी असलेल्या दोन संधीमध्ये या परीक्षेची गणना करण्यात येणार नाही. त्यामुळे या विद्यार्थ्यांना पुढील एक/दोन संधी उपलब्ध राहणार आहेत.
निकालात 1.23 टक्के वाढ
गतवर्षी मार्च 2020 मध्ये झालेल्या दहावीच्या परिक्षेचा निकाल 98.77 टक्के इतका लागला होता. यंदाचा निकाल 100 टक्के लागला आहे. या वर्षीच्या निकालात 1.23 टक्के इतकी वाढ झाली आहे
गतवर्षी मार्च 2020 मध्ये झालेल्या दहावीच्या परिक्षेचा निकाल 98.77 टक्के इतका लागला होता. यंदाचा निकाल 100 टक्के लागला आहे. या वर्षीच्या निकालात 1.23 टक्के इतकी वाढ झाली आहे