मुंबई : मुंबईच्या तापमानात किंचित वाढ होऊन २४ तासांत कुलाबा येथे २०.६ तर सांताक्रुझमध्ये १७.४ अंश सेल्सिअसची नोंद झाली. राज्यात सर्वात कमी तापमान गोंदीया येथे ७.६ अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेले.
विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय घट झाली आहे. कोकण-गोवा, मध्य-महाराष्ट्र व मराठवाड्याच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनते लक्षणीय घट तर कोकण-गोव्याच्या उर्वरीत भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट आणि वाढ झाली आहे. राज्याच्या उर्वरीत भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपास होते. २० जानेवारीपर्यंत गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.
गेल्या २४ तासांत राज्यातील प्रमुख शहरांमध्येनोंदवले गेलेले किमान तापमान (अंश सेल्सिअस) खालीलप्रमाणे:
मुंबई (कुलाबा) २०.६, सांताक्रुझ १७.४, अलिबाग १९.२, रत्नागिरी१९.४, पणजी (गोवा) २०.६, डहाणू १७.१, भिरा १८.०, पुणे १५.५, अहमदनगर १३.०, जळगाव १२.३, कोल्हापूर १७.१, महाबळेश्वर १४.४, मालेगाव १४.८, नाशिक १२.६, सांगली १५.५, सातारा १५.९, सोलापूर १६.०, औरंगाबाद १४.४, परभणी १३.५, नांदेड १५.५, अकोला १५.५, अमरावती ११.६, बुलढाणा १६.६, ब्रह्मपुरी ११.२,चंद्रपूर १२.२, गोंदिया ७.६, नागपूर १०.६, वाशिम १४.४, वर्धा११.६, यवतमाळ १५.६.